शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

भाजपाच नंबर वन!

By admin | Updated: January 10, 2017 05:19 IST

राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने

मुंबई/नागपूर : राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने बाजी मारली असून काँग्रेस ९१९ जागा आणि ३४ नगराध्यक्षांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिले.राज्यातील १९१ नगरपालिकांसाठी चार टप्प्यांत निवडणूक झाली. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय भाजपाच्या चांगलाच पथ्यावर पडला. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. पैशासाठी लोकांना बँकांसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या. अनेकांनी लग्नकार्ये पुढे ढकलली. त्यामुळे नोटाबंदीचा सत्ताधारी भाजपाला फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, तो खोटा ठरला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि समस्त मंत्रिगण भाजपाने प्रचारात उतरविले होते. शिवाय, गरजेनुसार स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे धोरण पक्षाने ठेवल्याने त्याचाही फायदा भाजपाला झाला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुठेही प्रचाराला गेले नाहीत. त्याचा फटका सेनेला बसला. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि स्थानिक नेते प्रचारात उतरले होते. काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविली. त्याचा फायदा झाल्याचे दिसून येते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडाली. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि डझनभर नेत्यांनी शहरं पिंजून काढली तरी या पक्षाच्या पदरात केवळ २२ ठिकाणचे नगराध्यक्षपद पडले.

चौथा टप्पाही जिंकलाचौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली. सात नगराध्यक्ष पदांसह सर्वाधिक जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेस व इतरांना दोन नगराध्यक्ष पदं मिळाली. चौथ्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

काटोलमध्ये ‘विदर्भ माझा’काटोलमध्ये भाजपातून बाहेर पडलेले चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या उमेदवारांना राजकुमार तिरपुडे यांच्या ‘विदर्भ माझा’ या पक्षाच्या चिन्हावर लढवित २३ पैकी १८ जागा जिंकून सत्ता मिळवली. विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विदर्भाच्या नावावर नव्यानेच स्थापलेल्या पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याने विदर्भवाद्यांचे मनोबल उंचावले.