शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच नंबर वन!

By admin | Updated: January 10, 2017 05:19 IST

राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने

मुंबई/नागपूर : राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने बाजी मारली असून काँग्रेस ९१९ जागा आणि ३४ नगराध्यक्षांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिले.राज्यातील १९१ नगरपालिकांसाठी चार टप्प्यांत निवडणूक झाली. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय भाजपाच्या चांगलाच पथ्यावर पडला. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. पैशासाठी लोकांना बँकांसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या. अनेकांनी लग्नकार्ये पुढे ढकलली. त्यामुळे नोटाबंदीचा सत्ताधारी भाजपाला फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, तो खोटा ठरला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि समस्त मंत्रिगण भाजपाने प्रचारात उतरविले होते. शिवाय, गरजेनुसार स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे धोरण पक्षाने ठेवल्याने त्याचाही फायदा भाजपाला झाला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुठेही प्रचाराला गेले नाहीत. त्याचा फटका सेनेला बसला. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि स्थानिक नेते प्रचारात उतरले होते. काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविली. त्याचा फायदा झाल्याचे दिसून येते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडाली. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि डझनभर नेत्यांनी शहरं पिंजून काढली तरी या पक्षाच्या पदरात केवळ २२ ठिकाणचे नगराध्यक्षपद पडले.

चौथा टप्पाही जिंकलाचौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली. सात नगराध्यक्ष पदांसह सर्वाधिक जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेस व इतरांना दोन नगराध्यक्ष पदं मिळाली. चौथ्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

काटोलमध्ये ‘विदर्भ माझा’काटोलमध्ये भाजपातून बाहेर पडलेले चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या उमेदवारांना राजकुमार तिरपुडे यांच्या ‘विदर्भ माझा’ या पक्षाच्या चिन्हावर लढवित २३ पैकी १८ जागा जिंकून सत्ता मिळवली. विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विदर्भाच्या नावावर नव्यानेच स्थापलेल्या पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याने विदर्भवाद्यांचे मनोबल उंचावले.