शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

भाजपा - शिवसेनेच्या गळाभेटीला गुढीपाढव्याचा मुहूर्त

By admin | Updated: March 24, 2017 19:32 IST

29 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याला भाजपाचे दोन मंत्री शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सत्तेत असून नेहमी भांडणा-या शिवसेना - भाजपामधील तणाव कितीही प्रयत्न तरी कमी होताना दिसत नाही आहे. याउलट रोज नव्या मुद्यांवर सत्तेतील हे दोघे भाऊ भांडताना दिसत आहेत. भाजपाला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसून वारंवार सरकारला अडचणीत आणत आहे. आपल्यातील हा दुरावा कमी करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 29 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याला भाजपाचे दोन मंत्री शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
 
सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून सातत्याने घेण्यात येत असलेली आडमुठी भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांकडून झालेली कोंडी या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने राज्यात सरकार टिकवण्यासाठी नव्या समिकरणांची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती समोर येत होती. त्यासाठी इतर पक्षातील आमदारांना आपल्या पक्षात घेणे किंवा थेट मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे, या पर्यायांची गुरुवारी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. 
 
राजकीय समीकरणं पाहता भाजपा शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे 29 मार्चला भाजपाकडून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं समजतं आहे. युतीतील ताणलेले संबंध निवळावे यावर चर्चा करण्यासाठी हो दोन्ही नेते मातोश्रीवर जाणार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
 
शिवसेनेकडून सरकारला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यावधी निवडणुका आणि भाजपाच्या संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 29 आमदारांना पक्षा प्रवेश देण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. पण या दोन्ही पर्यायांवर बैठकीत 50-50% मतं पडली त्यामुळे यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत.
 
भाजपाच्या कोअर बैठकीत मध्यावधी निवडणुकांसाठी किती आमदारांची तयारी आहे. तसेच मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षाची कामगिरी कशी राहील, याबाबत राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांशी सल्लामसलत केली असल्याचं समोर आलं होतं. तसेच संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांरांनी पक्षात प्रवेश देण्याचा पर्याय भाजपासमोर आहे. अशा आमदारांना भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आणून बहुमताचे गणित सोडवण्याचा भाजपा प्रयत्न करेल असं बोललं जात होतं.