शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदारांची घेतली जातेय हजेरी!

By admin | Updated: July 16, 2015 01:54 IST

भारतीय जनता पार्टीचे आमदार सध्या एका वेगळ्याच सक्तीने त्रस्त आहेत. विधान भवनात ते हजर आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना दर तासाला एक सही करावी लागत आहे.

- यदु जोशी,  मुंबईभारतीय जनता पार्टीचे आमदार सध्या एका वेगळ्याच सक्तीने त्रस्त आहेत. विधान भवनात ते हजर आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना दर तासाला एक सही करावी लागत आहे. सत्ताधारी आमदारांच्या अनुपस्थितीमुळे ऐनवेळी सरकारची तांत्रिक अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.आमदारांच्या सह्या घेण्याची जबाबदारी दहा आमदारांमागे एका आमदाराला देण्यात आली आहे. या आमदारांना एक छापील फॉर्म देण्यात आला आहे. आमदाराचे नाव, त्याची सही आणि किती वाजता सही केली असे तीन कॉलम त्यात आहेत. याबाबत एक आमदार म्हणाले की, दहा आमदारांच्या दिवसभर सह्या घेण्यातच माझा जास्त वेळ जातो; पण उपाय नाही, पक्षाचा आदेश आहे!साधारण ११ वाजता सभागृह सुरू होते. तेव्हापासून सभागृह संपेपर्यंत हा सहीप्रपंच भाजपाच्या आमदारांना करावा लागतो. ज्या आमदारांकडे सह्या घेण्याची जबाबदारी आहे त्यांना सह्या झालेले फॉर्म पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांच्याकडे रोज जमा करावे लागतात. ही नवीन सक्ती लागू झाल्याने भाजपाच्या आमदारांची विधानसभेतील उपस्थिती लक्षणीय वाढली आहे. आमदार सभागृहात किती वेळ देतात याचे रिपोर्ट कार्ड उपस्थितीच्या आधारे तयार करण्यात येणार असून, ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेशाची आस लावून असलेले आमदार तर न चुकता पूर्णवेळ सभागृहात हजर राहतात, असे सध्याचे चित्र आहे. शहा यांनी अलीकडील मुंबई भेटीत पक्षाच्या आमदारांनी अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त केले होते. आमदार आपापल्या मतदारसंघाला अधिकाधिक निधी मिळावा यासाठी मंत्री, अधिकाऱ्यांकडे चकरा मारत असतात. भाजपाच्या आमदारांना निधी देताना त्यांची सभागृहातील उपस्थिती किती हा निकषदेखील लावण्यात येणार असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. मंत्र्यांना पूर्ण वेळ दालनात राहण्याचे आदेशआपल्या खात्यासंबंधीचे प्रश्न असले वा कम्पल्सरी सिटिंग असेल तर मंत्री विधानसभेत वा परिषदेत बसून असतात. याशिवाय काही वेळ आपल्या दालनात बसून मंत्री निघून जातात असा आजवरचा बहुतेक मंत्र्यांबाबतचा अनुभव. मात्र, भाजपाच्या मंत्र्यांना सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून सभागृह संपेपर्यंत विधान भवनातच राहण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही सत्तारूढ पक्ष आहोत आणि अधिवेशन चालविण्याची जास्त जबाबदारी आमची आहे. वर्षातून साधारणत: ९० ते १०० दिवस अधिवेशन असते. पक्षाच्या आमदारांनी जास्तीतजास्त वेळ विधानसभेत बसावे म्हणून दर तासाला हजेरी घेतली जात आहे. महत्त्वाची विधेयके, धोरणात्मक निर्णय घेताना मतदानाची वेळ आली तर आमदारांना शोधून सभागृहात आणण्याची धावपळ आजवर व्हायची. - राज पुरोहित, भाजपाचे विधानसभेतील मुख्य प्रतोदसभागृह सुरू झाल्यापासून सभागृह संपेपर्यंत हा सहीप्रपंच भाजपाच्या आमदारांना करावा लागतो. ज्या आमदारांकडे सह्या घेण्याची जबाबदारी आहे त्यांना सह्या झालेले फॉर्म पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांच्याकडे रोज जमा करावे लागतात. ही नवीन सक्ती लागू झाल्याने उपस्थिती वाढली आहे.