शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिल्लोडमध्ये सामुहिक राजीनाम्यांची मोहीम; सत्तारांच्या उमेदवारीने भाजप नेते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 17:46 IST

गेल्या २५ वर्षापासून भाजपला सुटत असलेला सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदार यावेळी शिवसेनेला सुटला आहे.

- श्याम कुमार पुरे

मुंबई - सिल्लोड विधानसभेची जागा युतीच्या जागावाटपात शिवसेनेला सोडल्याने भाजपचे स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर माजी आमदार अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपच्या 588 पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे. तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देणार असल्याचा एक मुखी निर्णय सिल्लोड येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला.

गेल्या २५ वर्षापासून भाजपला सुटत असलेला सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदार यावेळी शिवसेनेला सुटला आहे. यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नाराजी पसरली आहे. पक्षाने उमेदवारी बाबत पुनर्विचार केला नाही, तर हे राजीनामे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या कडे बुधवारी देण्यात येतील याशिवाय मतदार संघातील गावागावातून सर्व भाजप कार्यकर्ते जिल्हा परिषद- पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा. प. सदस्य विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देतील. असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

युतीचा निर्णय अंतिम झाला नसल्याने भाजपला हा मतदारसंघ सुटण्याची अपेक्षा स्थानिक भाजपच्या नेत्यांना होती. मात्र आज युतीच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या असून सिल्लोड मतदारसंघ अधिकृतरीत्या शिवसेनेला सुटला असून, सत्तार यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील सर्व भाजप पुढारी सामूहिक राजीनामे देणार आहेत.

भाजपच्या वरिष्ठांनी या जागेचा पुनर्विचार केला नाही, तर या विधानसभा निवडणुकीत कुणाला उभे करायचे याचा एक मुखी निर्णय घेवून, आम्ही एकास एक उमेदवार मैदानात उतरवणार आहे. न्यानेश्र्वर मोठे ( भाजप तालुकाध्यक्ष )