शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

पुरणपोळी अन् पत्रिका, त्यावर लिहिलं होतं साहेब...; पंकजा मुंडे आठवणीनं गहिवरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:03 IST

मी २००४ पासून राजकारणात काम करते. संघर्षातून राजकारण करतेय. पडल्यानंतर जास्त मोठी झाली.

बीड - Pankaja Munde ( Marathi News ) गोपीनाथ गड हा पंकजा मुंडेंनी नव्हे तर तुम्ही केलाय. कारण त्या विचारांचे बीज माझ्या मेंदूत, हृदयात त्या पुरणपोळी आणि पत्रिकेने रोवलेला आहे म्हणून तो गड निर्माण केला. मी राजकारणात जिवंत राहणार का हे मला माहिती नव्हतं. मी या राज्यात गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी सर्वात मोठे योगदान देईल हे मी सांगितलं होतं. त्यातून संघर्ष यात्रा काढली. त्याचवेळी गोपीनाथ गड निर्माण केला अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी लोकांना सांगताना गहिवरल्या. 

बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, वटसावित्री पोर्णिमेचा तो दिवस होता, त्यादिवशी मी जिथे साहेबांच्या चितेला अग्नी दिला तिथे पाहिले तेव्हा कुणीतरी पुरणपोळी आणि एक पत्रिका ठेवली होती. त्यावर साहेब असा उल्लेख होता. मला हे पाहून गहिवरून आले. त्या माणसाने साहेबांच्या अग्नी दिला तिथे पत्रिका ठेवली. जर साहेबांना कुठे जागा नाही दिली तर ही लोक मरतील हा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी गोपीनाथ गड उभारणार हा निश्चय केला असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गोपीनाथ गड हा कुठला धार्मिक गड नाही, महंताचा गड नाही. कुठल्या संतांचा गड नाहीच नाही. तर एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, सामान्य माणसासाठी लढणाऱ्या सामान्य माणसांचा तो गड आहे. तो गड ऊर्जेचा, प्रेरणेचा, आशेचा आहे. गोपीनाथ गड हा मी निर्माण केला नाही. तर तो तुम्ही केलाय. मुंडेसाहेब ३ जूनला गेले. १२ डिसेंबरला त्या गडाचे भूमिपूजन केले त्यानंतर पुढच्या ३ जूनला अमित शाहांच्या हस्ते त्या गडाचं भूमिपूजन केले. ६ महिन्यात गड उभा केला. याठिकाणी हजारो लोक कार्यक्रमाला येतात. सगळ्या विचारांचे सगळ्या पक्षांचे नेते तिथे आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार हे नेते वगळता इतर सर्वच नेते आलेत असंही पंकजा मुंडेंनी सांगितले. 

दरम्यान, गोपीनाथ गड निर्माण करून तो लोकांना समर्पित केले, गडाच्या आधारे राजकारण करत नाही. गडावर हक्क सांगितला नाही. राजकारणातसुद्धा माणसाला परिपक्व बनावं लागते. मी २००४ पासून राजकारणात काम करते. संघर्षातून राजकारण करतेय. पडल्यानंतर जास्त मोठी झाली. मी पालकमंत्री असताना अनेकांना निधी दिला त्यामुळे माझी आठवणही आजही अनेकांना होतेय. ज्यांना कष्ट करता येतात, विचारांचे राजकारण होते. आता इतके दिवस वनवास भोगलाय, आता कलियुगात पाच वर्षच वनवास असावा. कुठेही गेले तरी माझ्यासोबत राहणार का? आपली स्वाभिमानाची लढाई कधीच सोडायची नाही. कलियुगाच्या राजकीय युद्धात माझ्या पाठिशी आशिवार्दाचे बळ उभं करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी जनतेला केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBJPभाजपा