शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुरणपोळी अन् पत्रिका, त्यावर लिहिलं होतं साहेब...; पंकजा मुंडे आठवणीनं गहिवरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:03 IST

मी २००४ पासून राजकारणात काम करते. संघर्षातून राजकारण करतेय. पडल्यानंतर जास्त मोठी झाली.

बीड - Pankaja Munde ( Marathi News ) गोपीनाथ गड हा पंकजा मुंडेंनी नव्हे तर तुम्ही केलाय. कारण त्या विचारांचे बीज माझ्या मेंदूत, हृदयात त्या पुरणपोळी आणि पत्रिकेने रोवलेला आहे म्हणून तो गड निर्माण केला. मी राजकारणात जिवंत राहणार का हे मला माहिती नव्हतं. मी या राज्यात गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी सर्वात मोठे योगदान देईल हे मी सांगितलं होतं. त्यातून संघर्ष यात्रा काढली. त्याचवेळी गोपीनाथ गड निर्माण केला अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी लोकांना सांगताना गहिवरल्या. 

बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, वटसावित्री पोर्णिमेचा तो दिवस होता, त्यादिवशी मी जिथे साहेबांच्या चितेला अग्नी दिला तिथे पाहिले तेव्हा कुणीतरी पुरणपोळी आणि एक पत्रिका ठेवली होती. त्यावर साहेब असा उल्लेख होता. मला हे पाहून गहिवरून आले. त्या माणसाने साहेबांच्या अग्नी दिला तिथे पत्रिका ठेवली. जर साहेबांना कुठे जागा नाही दिली तर ही लोक मरतील हा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी गोपीनाथ गड उभारणार हा निश्चय केला असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गोपीनाथ गड हा कुठला धार्मिक गड नाही, महंताचा गड नाही. कुठल्या संतांचा गड नाहीच नाही. तर एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, सामान्य माणसासाठी लढणाऱ्या सामान्य माणसांचा तो गड आहे. तो गड ऊर्जेचा, प्रेरणेचा, आशेचा आहे. गोपीनाथ गड हा मी निर्माण केला नाही. तर तो तुम्ही केलाय. मुंडेसाहेब ३ जूनला गेले. १२ डिसेंबरला त्या गडाचे भूमिपूजन केले त्यानंतर पुढच्या ३ जूनला अमित शाहांच्या हस्ते त्या गडाचं भूमिपूजन केले. ६ महिन्यात गड उभा केला. याठिकाणी हजारो लोक कार्यक्रमाला येतात. सगळ्या विचारांचे सगळ्या पक्षांचे नेते तिथे आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार हे नेते वगळता इतर सर्वच नेते आलेत असंही पंकजा मुंडेंनी सांगितले. 

दरम्यान, गोपीनाथ गड निर्माण करून तो लोकांना समर्पित केले, गडाच्या आधारे राजकारण करत नाही. गडावर हक्क सांगितला नाही. राजकारणातसुद्धा माणसाला परिपक्व बनावं लागते. मी २००४ पासून राजकारणात काम करते. संघर्षातून राजकारण करतेय. पडल्यानंतर जास्त मोठी झाली. मी पालकमंत्री असताना अनेकांना निधी दिला त्यामुळे माझी आठवणही आजही अनेकांना होतेय. ज्यांना कष्ट करता येतात, विचारांचे राजकारण होते. आता इतके दिवस वनवास भोगलाय, आता कलियुगात पाच वर्षच वनवास असावा. कुठेही गेले तरी माझ्यासोबत राहणार का? आपली स्वाभिमानाची लढाई कधीच सोडायची नाही. कलियुगाच्या राजकीय युद्धात माझ्या पाठिशी आशिवार्दाचे बळ उभं करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी जनतेला केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBJPभाजपा