शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिवसेनेची टीका लागली भाजपाच्या जिव्हारी

By admin | Updated: January 23, 2017 04:57 IST

महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाच्या गोटात संतापाची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपा नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार मनोज कोटक, योगेश सागर यांच्यासह मुंबईतील भाजपा आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत २२७ जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांचा या वेळी आढावा घेण्यात आला असून, मुंबईकरांना अपेक्षित असलेल्या पारदर्शक कारभाराबाबतचे जाहीरनाम्यातील मुद्दे अंतिम करण्यात आल्याची माहिती आशिष शेलार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.या वेळी युतीबाबत शिवसेना आणि भाजपा नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकांची माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला. हा प्रस्ताव म्हणजे भाजपाचा अपमान आहे. त्यामुळे ही आता पक्षाच्या मानसन्मानाची लढाई बनली आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. रात्री उशिरा राज्यातील पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक बोलावण्यात आली. शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये युतीसंदर्भातील तिसरी बैठक शनिवारी पार पडली, पण या बैठकीत भाजपाकडून देण्यात आलेला ११४ जागांचा प्रस्ताव फेटाळत, केवळ ६० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखविली. त्यामुळे युतीबाबतच्या तिसऱ्या बैठकीतही तणाव कायम होता. दरम्यान, भाजपाची मुंबईतील ताकद पाहता, ६० जागाही जास्त आहेत. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दानशूर आहेत. त्यामुळे त्यांनी जागा दिल्या, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. (प्रतिनिधी)चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात-एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून मुखपत्राच्या माध्यमातून सतत भाजपावर शरसंधान सुरू असल्याने पक्षाचे नेते अस्वस्थ आहेत. तशात सेना भाजपाला सन्मानजनक जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीबाबतचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच घेतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले.