शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शिवसेनेची टीका लागली भाजपाच्या जिव्हारी

By admin | Updated: January 23, 2017 04:57 IST

महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाच्या गोटात संतापाची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपा नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार मनोज कोटक, योगेश सागर यांच्यासह मुंबईतील भाजपा आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत २२७ जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांचा या वेळी आढावा घेण्यात आला असून, मुंबईकरांना अपेक्षित असलेल्या पारदर्शक कारभाराबाबतचे जाहीरनाम्यातील मुद्दे अंतिम करण्यात आल्याची माहिती आशिष शेलार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.या वेळी युतीबाबत शिवसेना आणि भाजपा नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकांची माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला. हा प्रस्ताव म्हणजे भाजपाचा अपमान आहे. त्यामुळे ही आता पक्षाच्या मानसन्मानाची लढाई बनली आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. रात्री उशिरा राज्यातील पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक बोलावण्यात आली. शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये युतीसंदर्भातील तिसरी बैठक शनिवारी पार पडली, पण या बैठकीत भाजपाकडून देण्यात आलेला ११४ जागांचा प्रस्ताव फेटाळत, केवळ ६० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखविली. त्यामुळे युतीबाबतच्या तिसऱ्या बैठकीतही तणाव कायम होता. दरम्यान, भाजपाची मुंबईतील ताकद पाहता, ६० जागाही जास्त आहेत. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दानशूर आहेत. त्यामुळे त्यांनी जागा दिल्या, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. (प्रतिनिधी)चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात-एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून मुखपत्राच्या माध्यमातून सतत भाजपावर शरसंधान सुरू असल्याने पक्षाचे नेते अस्वस्थ आहेत. तशात सेना भाजपाला सन्मानजनक जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीबाबतचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच घेतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले.