शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची टीका लागली भाजपाच्या जिव्हारी

By admin | Updated: January 23, 2017 04:57 IST

महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाच्या गोटात संतापाची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपा नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार मनोज कोटक, योगेश सागर यांच्यासह मुंबईतील भाजपा आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत २२७ जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांचा या वेळी आढावा घेण्यात आला असून, मुंबईकरांना अपेक्षित असलेल्या पारदर्शक कारभाराबाबतचे जाहीरनाम्यातील मुद्दे अंतिम करण्यात आल्याची माहिती आशिष शेलार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.या वेळी युतीबाबत शिवसेना आणि भाजपा नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकांची माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला. हा प्रस्ताव म्हणजे भाजपाचा अपमान आहे. त्यामुळे ही आता पक्षाच्या मानसन्मानाची लढाई बनली आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. रात्री उशिरा राज्यातील पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक बोलावण्यात आली. शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये युतीसंदर्भातील तिसरी बैठक शनिवारी पार पडली, पण या बैठकीत भाजपाकडून देण्यात आलेला ११४ जागांचा प्रस्ताव फेटाळत, केवळ ६० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखविली. त्यामुळे युतीबाबतच्या तिसऱ्या बैठकीतही तणाव कायम होता. दरम्यान, भाजपाची मुंबईतील ताकद पाहता, ६० जागाही जास्त आहेत. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दानशूर आहेत. त्यामुळे त्यांनी जागा दिल्या, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. (प्रतिनिधी)चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात-एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून मुखपत्राच्या माध्यमातून सतत भाजपावर शरसंधान सुरू असल्याने पक्षाचे नेते अस्वस्थ आहेत. तशात सेना भाजपाला सन्मानजनक जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीबाबतचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच घेतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले.