शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भाजपा गटनेत्यांच्या कार्यालयाला गळती

By admin | Updated: March 7, 2017 03:36 IST

दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर मात्र लाखोंची उधळपट्टी झाली आहे.

कल्याण : एकीकडे आर्थिक चणचणीमुळे कंत्राटदारांची बिले, केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाची कसरत चालू असताना दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर मात्र लाखोंची उधळपट्टी झाली आहे. मात्र, या नूतनीकरण केलेल्या दालनांचे काम निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे. भाजपाच्या दालनातील छताला पाण्याची गळती लागल्याने तेथील पीओपीचे मोठे नुकसान झाले आहे. वरच्या मजल्यावरील स्थायी समिती सभापतींच्या दालनातून ही गळती होत असल्याचे बोलले जात आहे. केडीएमसीच्या निवडणुकीनंतर सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना (५६ नगरसेवक), तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपा (४६ नगरसेवक) ठरला आहे. त्याखालोखाल मनसे १०, काँग्रेस ४, राष्ट्रवादीचे २ नगरसेवक आहेत. तळ मजल्यावर शिवसेनेचे गटनेते कार्यालय आहे. भाजपाचे पहिल्या मजल्यावर होते. मात्र, भाजपाचे नगरसेवक ९ वरून थेट ४३ पर्यंत वाढल्याने त्यांनी मोठे दालन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी पहिल्या मजल्यावरील प्रशस्त अशा मनसेच्या दालनासह बाजूकडील सचिव कार्यालयाची काही जागा मागितली होती. त्यानुसार, त्यांना जागा देण्यात आली. मनसेला तळ मजल्यावरील काँग्रेसचे कार्यालय देण्यात आले. या दालनांसह भाजपाच्या गटनेते कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या दालनाला काही दिवसांतच गळती लागली आहे. छतातून पाणी झिरपू लागल्याने पीओपीचे नुकसान झाले आहे. पीओपी काढावे लागले असून पाण्याची गळती वरील सभापती दालनाच्या पाइपलाइनमधून होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यादृष्टीने काम सुरू असल्याचे बांधकाम विभागाचे क निष्ठ अभियंता शैलेश मळेकर म्हणाले. (प्रतिनिधी)>पाटील यांची नाराजीदालनावर लाखोंचा खर्च करण्यात आला असताना काही दिवसांतच हा प्रकार घडल्याने भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनीही महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.