शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

कॉँग्रेसविषयी भाजपा सरकारची ‘सद्भावना’;राष्टवादीला नामोहरम केली जात असल्याची जयंत पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 22:39 IST

राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार करीत आहे. मात्र, राष्टवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच, शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो, त्याचमुळे राष्टवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यातील नव्या सरकारची नवलाई संपुष्टात आली तीन वर्षांत राज्याची प्रगती झाली की अधोगती?राज्यात विरोधी पक्षच शिल्लक नसल्याचे वातावरण भाजपा करीत आहेतविरोधी पक्ष म्हणून राष्टवादी कॉँग्रेसच प्रभावी

नाशिक : राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार करीत आहे. मात्र, राष्टवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच, शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो, त्याचमुळे राष्टवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. आमच्या मित्र पक्षाविषयी मात्र समन्वय आणि मित्रत्वाची भूमिका असल्याचे सांगत कॉँग्रेसचा नामोल्लेख न करता त्यांनी राज्य सरकारकडून त्यांच्याविषयी मवाळ भूमिका घेतली जात असल्याची टीका केली आहे.नाशिकच्या जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर जयंत पाटील यांनी रविवारी (दि.२४) ग्रामीण आणि शहर राष्टवादी कॉँग्रेसच्या बैठका राष्ट्रवादी भवनात घेतल्या. यावेळी त्यांनी ही टीका करतानाच येत्या १ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचे संकेत दिले. आमदार हेमंत टकले, पंकज भुजबळ, माजी खासदार माधवराव पाटील, देवीदास पिंगळे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष पंकज भुजबळ यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.राज्यातील नव्या सरकारची नवलाई संपुष्टात आली असून, तीन वर्षांत विविध पातळ्यांवर अपयश आलेले हे अपयशी सरकार आहे. तीन वर्षांत राज्याची प्रगती झाली की अधोगती याचा विचार केल्यानंतर आता कोणताही सुजाण नागरिक पुन्हा कमळाला मत देणार नाही. सध्याच्या सरकारविषयी भाजपा कार्यकर्त्यांशिवाय कोणीही उत्साहाने बोलत नाही, असे सांगून जयंत पाटील म्हणाले की, राज्यात विरोधी पक्षच शिल्लक नसल्याचे वातावरण भाजपा करीत आहेत. मात्र विरोधी पक्ष म्हणून राष्टवादी कॉँग्रेसच प्रभावी ठरू शकत असल्याने जाणीवपूर्वक समज- गैरसमज निर्माण करणाºया चर्चा पसरवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे राष्टÑवादीला नामोहरम करण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. असे सांगून त्यांनी आपल्या मित्राविषयी मात्र सद्भावना आणि मित्रत्वाची भूमिका सरकारची दिसते आहे, असे ते म्हणाले.सार्वत्रिक निवडणुकांना आता अवघे दीड ते दोन वर्षे शिल्लक असल्याने आता कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे, असे सांगून त्यांनी १ आॅक्टोबर रोजी राज्यात भाजपा सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, तसे प्रदेश स्तरावरून घोषित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले