शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

भाजपा सरकार ‘फेकू’!

By admin | Updated: April 17, 2017 02:41 IST

राज्यातील भाजपाप्रणित युती सरकार हे फेकू सरकार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची त्यांची इच्छाच नाही, मात्र कर्जमाफी झाल्याशिवाय आता थांबणे नाही

जळगाव/धुळे/नंदुरबार : राज्यातील भाजपाप्रणित युती सरकार हे फेकू सरकार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची त्यांची इच्छाच नाही, मात्र कर्जमाफी झाल्याशिवाय आता थांबणे नाही, असा निर्धार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी संघर्ष यात्रेच्या खान्देशातील सभेत व्यक्त केला. तर उत्तर प्रदेशातील कर्जमाफीचे मॉडेल आम्हाला मान्य नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.खान्देशात रविवारी एरंडोल, पारोळा व अमळनेर (जि. जळगाव) आणि बेटावद, शिरपूर (जि. धुळे) तसेच शहादा आणि नंदुरबार (जि. नंदुरबार) येथे जाहीर सभा झाल्या. उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, पण फडणवीस सरकार ३० महिन्यांत कर्ज माफ का करू शकले नाही? शासनाला गोहत्या चालत नाही, मात्र शेतकरी आत्महत्या कशी चालते, असा प्रश्न करत कर्जमाफीशिवाय आता थांबणार नाही, असा इशारा पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील सभांमध्ये दिला. आम्हाला कर्जमाफीचा ‘यूपी पॅटर्न’ मान्य नाही. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करुन १०० टक्के कर्जमाफी आम्हाला हवी असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेटावद येथे जाहीर सभेत सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)