शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

भाजपा सरकार ‘फेकू’!

By admin | Updated: April 17, 2017 02:41 IST

राज्यातील भाजपाप्रणित युती सरकार हे फेकू सरकार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची त्यांची इच्छाच नाही, मात्र कर्जमाफी झाल्याशिवाय आता थांबणे नाही

जळगाव/धुळे/नंदुरबार : राज्यातील भाजपाप्रणित युती सरकार हे फेकू सरकार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची त्यांची इच्छाच नाही, मात्र कर्जमाफी झाल्याशिवाय आता थांबणे नाही, असा निर्धार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी संघर्ष यात्रेच्या खान्देशातील सभेत व्यक्त केला. तर उत्तर प्रदेशातील कर्जमाफीचे मॉडेल आम्हाला मान्य नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.खान्देशात रविवारी एरंडोल, पारोळा व अमळनेर (जि. जळगाव) आणि बेटावद, शिरपूर (जि. धुळे) तसेच शहादा आणि नंदुरबार (जि. नंदुरबार) येथे जाहीर सभा झाल्या. उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, पण फडणवीस सरकार ३० महिन्यांत कर्ज माफ का करू शकले नाही? शासनाला गोहत्या चालत नाही, मात्र शेतकरी आत्महत्या कशी चालते, असा प्रश्न करत कर्जमाफीशिवाय आता थांबणार नाही, असा इशारा पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील सभांमध्ये दिला. आम्हाला कर्जमाफीचा ‘यूपी पॅटर्न’ मान्य नाही. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करुन १०० टक्के कर्जमाफी आम्हाला हवी असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेटावद येथे जाहीर सभेत सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)