शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

‘भाजपा सरकार असंवेदनशील’

By admin | Updated: November 1, 2015 01:49 IST

महाराष्ट्रात चिक्की घोटाळा, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा, तर छत्तीसगडमध्येही घोटाळे समोर येत आहेत़ महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यावर मात करून शेतकरी

उस्मानाबाद : महाराष्ट्रात चिक्की घोटाळा, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा, तर छत्तीसगडमध्येही घोटाळे समोर येत आहेत़ महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यावर मात करून शेतकरी आत्महत्या रोखण्याकडे लक्ष देण्याऐवजी भाजपा आणि शिवसेनेचे खुर्चीसाठी भांडण सुरू आहे़ त्यामुळे अशा असंवेदनशील शासनाविरोधात महिला काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा यांनी दिली़उस्मानाबाद येथे शनिवारी जिल्हा महिला काँग्रेसतर्फे महिला दुष्काळ परिषद व महिला मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़ ओझा म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे़ मात्र, राज्यातील भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी खुर्चीसाठी भांडण करीत आहेत़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, भाजपा २,८०० तर शिवसेना ४,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत आहे़ त्यावरून शेतकऱ्यांच्या प्राणांची किंमतही शासनाला कळू शकलेली नसून, शेतकरी आत्महत्या रोखण्यातही शासनाला अपयश आले,’ असे त्यांनी सांगितले़ काँग्रेसच्या सत्तेत तुरडाळ ५५ रुपये किलो झाली, म्हणून विरोधी बाकावर असताना भाजपाने आंदोलन पुकारले होते़ तूरडाळ आता २०० रुपये किलोच्या पुढे गेली आहे़ युवकांच्या हाताला काम नाही, गुन्हेगारी वाढली असून, महिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे़ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफी, शैक्षणिक, परीक्षा शुल्क माफी देणे आवश्यक असताना सांप्रदायिक अजेंड्यावर काम सुरू आहे, अशी टीका ओझा यांनी केली. (प्रतिनिधी)