शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

भाजपा सरकार शेतकरी विरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:46 IST

नांदूरशिंगोटे : सन १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ यावर्षी आहे; परंतु शासनाने विविध निकष लावल्याने राज्यातील अनेक गावे दुष्काळी जाहीर होण्यापासून पासून वंचित राहिली आहेत. गेली चार वर्षे भाजपा शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून मोदी सरकारच्या काळात एकही ठोस काम झालेले नाही. केंद्राप्रमाणेच राज्यातही दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने हे शासन शेतकरी विरोधी असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देधनंजय मुंडे : शेतकरी मेळावा, पाणी परिषदेत टीका

नांदूरशिंगोटे : सन १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ यावर्षी आहे; परंतु शासनाने विविध निकष लावल्याने राज्यातील अनेक गावे दुष्काळी जाहीर होण्यापासून पासून वंचित राहिली आहेत. गेली चार वर्षे भाजपा शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून मोदी सरकारच्या काळात एकही ठोस काम झालेले नाही. केंद्राप्रमाणेच राज्यातही दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने हे शासन शेतकरी विरोधी असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.येथे आयोजित शेतकरी मेळावा व पाणी परिषदेच्या कार्यक्र मात मुंडे बोलत होते. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार डॉ सुधीर तांबे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, अ‍ॅड भगीरथ शिंदे, माजी खासदार देवीदास पिंगळे, बंडूनाना भाबड, माजी आमदार जयवंत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, भारती पवार, बाळासाहेब वाघ आदी होते.देशात व राज्यातील परिस्थिती सर्वांना माहीत आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविली; परंतु चार वर्षांच्या काळात सर्वच योजना फसव्या ठरल्या असल्याचे मुंडे यांनी सांगितले. भाजपाचे लोक आकडेमोड करण्यात पटाईत असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफी देताना मोठ्या प्रमाणात निकष व अटी टाकल्याने त्याचा लाभ शेतकºयांना झाला नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलने केल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या काळात एकदाही शेतकºयांना अनुदान मिळाले नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. दुष्काळसदृश तालुक्यांत दुष्काळ जाहीर करताना निकष लावल्याने वंचित राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारवर यावेळी मुंडे यांनी चौफेर टीका केली. बंडूनाना भाबड यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी बंडूनाना भाबड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बंडूनाना भाबड यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच नंदाताई भाबड, आत्माराम बिडगर, अरुण शेळके, राजेश भाबड, बाजीराव दराडे, विश्वास मुर्तडक, संजय खैरनार, सुनील नाईक, सुदाम बोडके, मंगेश शेळके, यतीन भाबड, समाधान गायकवाड, विश्वास भाबड, हेमंत दिघोळे आदीसह तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ भाबड यांनी केले तर आभार राजेश भाबड यांनी मानले.पाण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजेराजकारणाच्या वेळेस राजकारण केले पाहिजे; मात्र विकासाच्या कामासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. भविष्यात सर्वांना पाण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविण्याचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यकाळात मोदी सरकार पाण्यावरसुद्धा कर लावण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.