शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

खान्देशात भाजपा आणखी मजबूत

By admin | Updated: February 26, 2017 01:45 IST

भाजपाचे नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी नकारात्मक प्रचाराला परिपक्वतेने तोंड देत जिद्दीने स्वबळावर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावला आहे.

- मिलिंद कुलकर्णी,  जळगाव

भाजपाचे नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी नकारात्मक प्रचाराला परिपक्वतेने तोंड देत जिद्दीने स्वबळावर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावला आहे. सलग १५ वर्षे सत्ता ताब्यात असूनही ‘अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर’चा परिणाम होऊ दिला नाही. शिवसेनेचे बळ ‘जैसे थे’ राहिले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या भाजपाच्या दोन नेत्यांचे गट पक्षात आमने-सामने उभे ठाकलेले आहेत. विधान परिषद निवडणुकीत ही दरी अधिक रुंदावली. पालिका निवडणुकीत यश मिळाले असले तरी खरी कसोटी ग्रामीण भागात होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जळगावच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवून दोन्ही गटांना सोबत घेऊन निवडणुकीचे आव्हान पेलले. खडसे यांनी त्यांच्या मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. परिणामी, भाजपाच्या ३३ जागांपैकी या मतदारसंघात २२ जागा निवडून आल्या आहेत. खासदार ए.टी. पाटील यांच्या मतदारसंघात मात्र भाजपाची कामगिरी समाधानकारक नाही. १५पैकी ८ पंचायत समितीमध्ये कमळ फुलले तर सेनेला ४ समित्यांमध्ये यश मिळाले. पारोळ्याला केवळ एका म्हणजे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या गावात राष्ट्रवादीला यश मिळाले. चाळीसगाव व चोपड्यात भाजपा व राष्ट्रवादीचे समसमान सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ४ने घटून १६वर आले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार दिलीप वाघ, साहेबराव पाटील यांच्या गावांमध्ये पक्षाची कामगिरी बरी झाली आहे. मात्र माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मतदारसंघात निराशा झाली. माजी आमदार राजीव देशमुख, संजय गरुड यांनी आपल्या तालुक्यांमध्ये लक्षणीय कामगिरी केली. माजी खासदार वसंतराव मोरे यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या स्नुषेचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेला गेल्या वेळेची १४ हीच संख्या गाठताना दमछाक झाली. तीन आमदारांपैकी गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांच्या मतदारसंघात समाधानकारक कामगिरी झाली, मात्र आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मतदारसंघात कामगिरी खालावली. पालिकेपाठोपाठ याही निवडणुकीत या ठिकाणी यश मिळालेले नाही. दोन्ही कॉँग्रेसला धक्काकाँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. संख्याबळ ६ने घटून ४वर आले. भाजपाच्या काँग्रेसमुक्तीची घोषणापूर्ती ११ तालुक्यांमध्ये झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ४ने घटून १६वर आले आहे.