शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

सेनेने भाजपाचा मेळावा उधळला!

By admin | Updated: March 23, 2016 04:13 IST

स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावरून भाजपा-शिवसेनेत रण पेटले असून, त्याचे पडसाद मंगळवारी नाशिकमध्ये उमटले. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वेगळ्या

नाशिक : स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावरून भाजपा-शिवसेनेत रण पेटले असून, त्याचे पडसाद मंगळवारी नाशिकमध्ये उमटले. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वेगळ्या मराठवाड्याचे समर्थन केल्याचा आरोप करीत भाजपाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी धुडगूस घातला. शिवसैनिकांनी केलेल्या खुर्च्यांच्या फेकाफेकीत महिला व मुले जखमी झाले. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोषींवर त्वरित कारवाई करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते हटून बसले होते.श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर मराठवाडा स्वतंत्र व्हावा ही जुनीच मागणी असल्याचे रहाटकर यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. माध्यमांमधून हे समजल्यानंतर शिवसैनिकांनीही व्यूहरचना केली. सायंकाळी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि भाजपा महिला आघाडीच्या वतीने मेळावा तसेच विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्कारार्थींचे मनोगत सुरू असतानाच शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संघटनप्रमुख सत्यभामा गाडेकर तसेच अन्य महिला तसेच पुरुष शिवसैनिक कार्यक्रमस्थळी घोषणा देत घुसले आणि वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा मागणाऱ्यांचा धिक्कार असो, घोषणा देत गोंधळ घातला. खुर्च्या उचलून फेकण्यास सुरुवात केल्याने उपस्थित महिला आणि अन्य कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झाली. सेना स्टाइलने उत्तर देण्याच्या प्रकारात अनेक महिला आणि दोन लहान मुलांना खुर्च्या लागल्याने ते जखमी झाले. पोलीस तेथे पोहोचेपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार बंद करून घेतले आणि सेनेच्या महिला कार्यकर्त्यांना पकडून ठेवले. त्यानंतर पोलीस आले आणि धरपकड सुरू झाली. सभागृहाच्या बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी अटक करण्याची मागणी केली. कार्यक्रम नंतर सुरळीत सुरू झाला. (प्रतिनिधी)‘लिव्ह इन...’मध्येवाढती फसवणूक‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग विशेष प्रयत्न करीत असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. १९९३ पासून आयोगाकडे प्रकरणे प्रलंबित असून गेल्या दीड महिन्यात पाच हजार प्रकरणांची विगतवारी करून आता केवळ पंधराशे प्रकरणे शिल्लक राहिली आहेत, असे त्या म्हणाल्या.