शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

सेनेने भाजपाचा मेळावा उधळला!

By admin | Updated: March 23, 2016 04:13 IST

स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावरून भाजपा-शिवसेनेत रण पेटले असून, त्याचे पडसाद मंगळवारी नाशिकमध्ये उमटले. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वेगळ्या

नाशिक : स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावरून भाजपा-शिवसेनेत रण पेटले असून, त्याचे पडसाद मंगळवारी नाशिकमध्ये उमटले. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वेगळ्या मराठवाड्याचे समर्थन केल्याचा आरोप करीत भाजपाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी धुडगूस घातला. शिवसैनिकांनी केलेल्या खुर्च्यांच्या फेकाफेकीत महिला व मुले जखमी झाले. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोषींवर त्वरित कारवाई करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते हटून बसले होते.श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर मराठवाडा स्वतंत्र व्हावा ही जुनीच मागणी असल्याचे रहाटकर यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. माध्यमांमधून हे समजल्यानंतर शिवसैनिकांनीही व्यूहरचना केली. सायंकाळी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि भाजपा महिला आघाडीच्या वतीने मेळावा तसेच विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्कारार्थींचे मनोगत सुरू असतानाच शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संघटनप्रमुख सत्यभामा गाडेकर तसेच अन्य महिला तसेच पुरुष शिवसैनिक कार्यक्रमस्थळी घोषणा देत घुसले आणि वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा मागणाऱ्यांचा धिक्कार असो, घोषणा देत गोंधळ घातला. खुर्च्या उचलून फेकण्यास सुरुवात केल्याने उपस्थित महिला आणि अन्य कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झाली. सेना स्टाइलने उत्तर देण्याच्या प्रकारात अनेक महिला आणि दोन लहान मुलांना खुर्च्या लागल्याने ते जखमी झाले. पोलीस तेथे पोहोचेपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार बंद करून घेतले आणि सेनेच्या महिला कार्यकर्त्यांना पकडून ठेवले. त्यानंतर पोलीस आले आणि धरपकड सुरू झाली. सभागृहाच्या बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी अटक करण्याची मागणी केली. कार्यक्रम नंतर सुरळीत सुरू झाला. (प्रतिनिधी)‘लिव्ह इन...’मध्येवाढती फसवणूक‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग विशेष प्रयत्न करीत असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. १९९३ पासून आयोगाकडे प्रकरणे प्रलंबित असून गेल्या दीड महिन्यात पाच हजार प्रकरणांची विगतवारी करून आता केवळ पंधराशे प्रकरणे शिल्लक राहिली आहेत, असे त्या म्हणाल्या.