शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारावरून भाजपा - सेनेत गरमागरमी

By admin | Updated: December 2, 2015 03:05 IST

मंत्रीमंडळाचा विस्तारावरुन भाजपा शिवसेनेतील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून एकमेकांना शह-काटशह देण्याच्या खेळीमुळे विस्ताराचा विषय लटकला आहे.

- अतुल कुलकर्णी, मुंबई

मंत्रीमंडळाचा विस्तारावरुन भाजपा शिवसेनेतील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून एकमेकांना शह-काटशह देण्याच्या खेळीमुळे विस्ताराचा विषय लटकला आहे. त्यातच शिवसेनेने सरकार विरोधी भूमिका कायम ठेवल्याने होणारा विस्तार सेनेशिवाय करायचा का,याचीही चाचपणी पक्षात जोरात सुरु झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरात पत्रकार परिषद घेऊन विस्तार होणार, असे जाहीर केले. त्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करुन टाकली. या प्रकाराने मुख्यमंत्री नाराज झाले. आपली नाराजी बोलून न दाखवता फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांचा २७ तारखेचा आणि दानवेंचा ३० तारखेचा मूहुर्त चुकवला. मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा निर्णय असताना एखादा कॅबिनेट मंत्री कितीही कोणाच्याही जवळचा असला तरीही परस्पर असा निर्णय कसा काय जाहीर करु शकतो, अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या कानी घातल्याचे सांगण्यात आले.हे घडत असताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी जूळवून घेण्यासाठी दिल्लीच्या नेत्यांना राजी केले होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालाची पार्श्वभूमी त्याला होती. यापुढे आपण शिवसेनेशी पूर्वीसारखेच चांगले संबंध ठेवावेत यावर दिल्लीही तयार झाली; मात्र शिवसेनेने मराठवाड्याचा दौरा करताना पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावण्याचे काम शिवसेनेने चालूच ठेवले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला आपली स्ट्रॅटेजी बदलणे भाग पडल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने लोकमतशी बोलताना सांगितले. मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन राज्यमंत्री पदे मिळणार आहेत. त्याचा तसाही फारसा फायदा नाही त्यामुळे आपण जनतेच्या बाजूने आहोत हे दाखवण्याचे काम चालूच ठेवण्याची भूमिका सेनेने घेतली आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचेही तो मंत्री म्हणाला.शिवसेनेने एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गुलाबराव पाटील यांना मंत्री करण्याचे घाटल्याने खडसे देखील विस्तार कसा टाळता येईल याच्या प्रयत्नात असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेनेने प्रताप पाटील चिखलीकर आणि सुचित मिंचेकर अशा दोघांची नावे निश्चित केल्याचे समजते. मुंबई महापालिका निवडणुका होईपर्यंत शिवसेना असेच वागत राहील हे लक्षात घेऊन भाजपाने काँग्रेसच्या एका गटाशी संपर्क सुरु ठेवला आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबत किती जण वेगळा गट करु शकतात, याचीही शक्यता आतापासूनच पडताळून पाहीली जात आहे. मुख्यमंत्र्यांना शिवसेनेशी जूळवून घ्यावे वाटत असताना हे चालू आहे हे विशेष. मंत्रिपदावरून अंतर्गत कलह शिगेलादुसरीकडे भाजपात मंत्रीपदावरुन अंतर्गत कलह शिगेला गेला आहे. चैनसुख संचेती, भाऊसाहेब फुंडकर, संजय कुटे यांच्यातील वाद कसा मिटवायचा हा यक्ष प्रश्न पक्षापुढे आहे. काही विद्यमान मंत्र्यांना आपल्या खात्यांमध्ये बदल हवा आहे. हा वादही सध्या पक्षात स्फोटाचा विषय बनू शकतो. दानवे पडद्याआड राहून विस्तार कसा होईल यासाठी प्रयत्नरत आहेत. काही करुन त्यांना मानणारे मंत्री त्यांना आणायचे आहेत. या सगळ्या वादावादीत शनिवारपर्यंत काय घडते याकडे दोन्ही पक्षांचे आमदार डोळे लावून बसले आहेत.