शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला पाठिंबा नाही, लिहून देतो!

By admin | Updated: February 19, 2017 05:18 IST

शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राज्यात पुन्हा सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाला पाठिंबा देणार नाही, आत्ता या पत्रकार परिषदेत आपण ही गोष्ट पक्षाच्या

मुंबई : शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राज्यात पुन्हा सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाला पाठिंबा देणार नाही, आत्ता या पत्रकार परिषदेत आपण ही गोष्ट पक्षाच्या लेटरपॅडवर लिहून देण्यास तयार आहोत, लिहिलेले ते पत्र आपण राज्यपालांनाही देऊ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तशी भूमिका घ्यावी; आणि या निवडणुकीनंतर त्यांनीही भाजपा सरकारला पाठिंबा देऊ नये, असा फुल टॉस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत टाकला.राज्यात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी भाजपा, शिवसेनेला अनेक फटके मारले. उत्तर प्रदेश निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे, तीच भूमिका जर राज्यात फडणवीस यांनी घेतली तर आपण या सरकारला बिनशर्त पाठिंबा देऊ, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये कायम राहण्याचा मार्ग तयार करून ठेवला आहे. पण आपली भूमिका स्पष्ट आहे; आणि ती आपण लिहून देण्यासही तयार आहोत, असे पवार म्हणाले.पवार म्हणाले, सध्या शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता सरकार कधीही अस्थिर होऊ शकते. परंतु एकीकडे शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करीत असतानाच दुसरीकडे कर्जमाफी केली तर भाजपा सरकार पाच वर्षे चालू शकते, असे सांगत आहे. आता भाजपाला राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याशिवाय पर्याय नाही, असा टोलाही पवारांनी लगावला. महाराष्ट्रातील सरकार घालविण्यापेक्षा, पुन्हा निवडणुकीवर व जाहिरातींवर हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा तसेच शिवसेना पक्ष प्रमुखांच्या प्रकृतीचा विचार करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे कधीही चांगले, असा चिमटाही पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला.या आधी तुम्हीच भाजपाला न मागता पाठिंबा देऊ केला होता, तो कशासाठी? शिवाय विरोधकांची जागाही शिवसेनेने घेतली. ती जागा देखील तुमच्या पक्षाला मिळवता आली नाही असे का झाले?, असा सवाल केला असता ते म्हणाले, राज्यात विधानसभेच्या निवडणुका सगळेच पक्ष वेगवेगळे लढले होते. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पुन्हा निवडणुका घेणे राज्याच्या हिताचे नव्हते. शिवाय भाजपाचे सरकार होऊ दिले नसते तर आम्ही त्यांना संधी मिळू दिली नाही, असाही आरोप झाला असता, म्हणून त्यावेळी सरकार स्थिर रहावे यासाठी मी ती भूमिका घेतली होती. आमच्या पक्षाच्या सगळ््या नेत्यांनी एकत्रित बसून धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणून आम्ही गप्प बसलो. आता दोन अडीच वर्षांत जनतेला भाजपाचे खायचे आणि दाखवायचे दात कळाले आहेत. शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर किती घनिष्ठ प्रेम आहे. हे त्या दोघांना आणि राज्यातील जनतेलाही कळाले आहे. त्यामुळे आता राज्यात निवडणुका घेण्यास चांगले वातावरण आहे, असेही पवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)