शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजपाला पाठिंबा नाही, लिहून देतो!

By admin | Updated: February 19, 2017 05:18 IST

शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राज्यात पुन्हा सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाला पाठिंबा देणार नाही, आत्ता या पत्रकार परिषदेत आपण ही गोष्ट पक्षाच्या

मुंबई : शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राज्यात पुन्हा सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाला पाठिंबा देणार नाही, आत्ता या पत्रकार परिषदेत आपण ही गोष्ट पक्षाच्या लेटरपॅडवर लिहून देण्यास तयार आहोत, लिहिलेले ते पत्र आपण राज्यपालांनाही देऊ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तशी भूमिका घ्यावी; आणि या निवडणुकीनंतर त्यांनीही भाजपा सरकारला पाठिंबा देऊ नये, असा फुल टॉस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत टाकला.राज्यात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी भाजपा, शिवसेनेला अनेक फटके मारले. उत्तर प्रदेश निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे, तीच भूमिका जर राज्यात फडणवीस यांनी घेतली तर आपण या सरकारला बिनशर्त पाठिंबा देऊ, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये कायम राहण्याचा मार्ग तयार करून ठेवला आहे. पण आपली भूमिका स्पष्ट आहे; आणि ती आपण लिहून देण्यासही तयार आहोत, असे पवार म्हणाले.पवार म्हणाले, सध्या शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता सरकार कधीही अस्थिर होऊ शकते. परंतु एकीकडे शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करीत असतानाच दुसरीकडे कर्जमाफी केली तर भाजपा सरकार पाच वर्षे चालू शकते, असे सांगत आहे. आता भाजपाला राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याशिवाय पर्याय नाही, असा टोलाही पवारांनी लगावला. महाराष्ट्रातील सरकार घालविण्यापेक्षा, पुन्हा निवडणुकीवर व जाहिरातींवर हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा तसेच शिवसेना पक्ष प्रमुखांच्या प्रकृतीचा विचार करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे कधीही चांगले, असा चिमटाही पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला.या आधी तुम्हीच भाजपाला न मागता पाठिंबा देऊ केला होता, तो कशासाठी? शिवाय विरोधकांची जागाही शिवसेनेने घेतली. ती जागा देखील तुमच्या पक्षाला मिळवता आली नाही असे का झाले?, असा सवाल केला असता ते म्हणाले, राज्यात विधानसभेच्या निवडणुका सगळेच पक्ष वेगवेगळे लढले होते. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पुन्हा निवडणुका घेणे राज्याच्या हिताचे नव्हते. शिवाय भाजपाचे सरकार होऊ दिले नसते तर आम्ही त्यांना संधी मिळू दिली नाही, असाही आरोप झाला असता, म्हणून त्यावेळी सरकार स्थिर रहावे यासाठी मी ती भूमिका घेतली होती. आमच्या पक्षाच्या सगळ््या नेत्यांनी एकत्रित बसून धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणून आम्ही गप्प बसलो. आता दोन अडीच वर्षांत जनतेला भाजपाचे खायचे आणि दाखवायचे दात कळाले आहेत. शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर किती घनिष्ठ प्रेम आहे. हे त्या दोघांना आणि राज्यातील जनतेलाही कळाले आहे. त्यामुळे आता राज्यात निवडणुका घेण्यास चांगले वातावरण आहे, असेही पवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)