शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक, जि.प.सदस्यांसाठी आचारसंहिता: दानवे

By admin | Updated: February 19, 2017 03:18 IST

भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक महापालिकेतील नगरसेवक आणि जिल्हा परिषदांतील सदस्य हे दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करतील आणि त्यात अवाजवी वाढ झाल्याचे आपल्याला

- यदु जोशी,  मुंबई

भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक महापालिकेतील नगरसेवक आणि जिल्हा परिषदांतील सदस्य हे दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करतील आणि त्यात अवाजवी वाढ झाल्याचे आपल्याला कुठेही दिसणार नाही, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. पारदर्शकतेच्या आम्ही नुसत्या गप्पा मारत नाही. संपत्तीचा तपशीलच काय, पण भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका व जिल्हा परिषदांमधील टेंडरची प्रक्रिया पारदर्शक केली जाईल आणि ती जनतेसाठी खुली केली जाईल, असे खा. दानवे म्हणाले. निवडणुकीच्या प्रचारात केवळ मुख्यमंत्र्यांनाच प्रोजेक्ट केले जातेय. बाकीच्यांना स्थान का नाही? मग यश, अपयशाची जबाबदारी कोणाची ?आम्ही सगळेच प्रचारात आहोत. मुंबईतील जाहिरातींमध्ये, ‘मी शब्द देतो’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मतदारांना आवाहन केले, यात काहीही चूक नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तेच शब्द देऊन त्याची पूर्तताही करू शकतात. यशापयशाचे म्हणाल, तर भाजपात सामूहिक जबाबदारी असते.शिवसेना दरक्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या प्रत्येक नेत्याचा पाणउतारा करीत असतानाही तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन त्यांची वाट्टेल ती बोलणी सहन करताय ना?शिवसेनेची पोटदुखी वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला १२३ तर त्यांना ६३ जागा मिळाल्या, तेव्हापासून ते अस्वस्थ आहेत. त्यांची नाराजी मतदारांवर आहे, ते ती आमच्यावर काढतात. ‘लेकी बोले सुने लागे’ असा हा प्रकार आहे. मराठा समाजाने फडणवीस सरकारला या निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केले आहे. आपली प्रतिक्रिया? राणेंचे त्यांच्या जवळच्यांनीही ऐकले तरी खूप झाले. वर्षभरासाठी मिळालेले मुख्यमंत्रिपद पुन्हा मिळाले नाही, हे त्यांचे शल्य आहे. ‘शिंक्याचं तुटतं का अन् बोक्याचं बनतं का’ अशी वाट ते पाहत आहेत. निवडणुकीच्या राजकारणाशी आमचा संबंध नाही, असे अनेक मराठा संघटनांनी आधीच स्पष्ट केले आहे. आपण आपल्या कन्येला जि.प.ची उमेदवारी दिली. घराणेशाही अन् गुंडशाही भाजपामध्येही घुसली तर? माझी मुलगी आधीच सरपंच आहे. परिसरातील गावांची तिला उमेदवारी देण्याची मागणी होती, म्हणून उमेदवारी दिली. माझ्या तीन मुली तीन राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरात दिलेल्या आहेत. गुंडशाहीबाबत आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी सर्वाधिक गुंड उमेदवार दिल्याचे सगळ्यांनी वाचलेय आता. १२ जि.प.स्वबळावर जिंकू२५ पैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता येईल, असा दावा दानवे यांनी केला. ते म्हणाले की, इतर काही ठिकाणी आम्ही इतरांच्या पाठिंब्याने सत्ता मिळवू. मुख्यमंत्री, मी, भाजपाचे मंत्री, पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांचे हे यश असेल.