शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-काँग्रेसची ‘माघार’ युती

By admin | Updated: December 13, 2015 03:08 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेली नागपूरच्या विधान परिषदेची जागा काँग्रेसने आज आंदण देऊन टाकली.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेली नागपूरच्या विधान परिषदेची जागा काँग्रेसने आज आंदण देऊन टाकली. काँग्रेसचे उमेदवार अशोकसिंह चव्हाण यांनी माघार घेतल्याने भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसने अशी अचानक माघार घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दुसरीकडे मुंबईत भाजपाचे मनोज कोटक यांनी माघार घेतल्याचा फायदा काँग्रेसचे भाई जगताप यांना मिळेल. त्यामुळे भाजपा-काँग्रेसने एकमेकांना मदत करण्याची अनोखी ‘माघार’युती आज समोर आली. मुंबईत विधान परिषदेच्या दोन जागा आहेत. त्यातील एका जागेवर शिवसेनेचे रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जातो. दुसरी जागा युतीमध्ये भाजपा लढणार होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा होऊन तसा निर्णयदेखील झाला होता. भाजपाचे कोटक यांच्या उमेदवारीमुळे भाई जगताप यांना निवडून येण्यासाठी निश्चितपणे संघर्ष करावा लागला असता. भाजपासाठी नागपूरची जागा प्रतिष्ठेची होती तर मुंबईची जागा कायम राखणे काँग्रेससाठी आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर, राजधानीतून भाजपाने तर उपराजधानीतून काँग्रेसने माघार घेण्याचे ठरले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईत मनसेने निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने मनसेची मते मिळवून जागा जिंकण्याच्या भाजपाच्या इराद्यावर तसेही पाणी फिरले होते. त्यामुळे हसे करून घेण्यापेक्षा नागपूरची जागा पदरात पाडून घेणे भाजपाने पसंत केले. नागपूरची निवडणूक बिनविरोध होणार असली तरी मुंबईत राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन अपक्ष लढत असलेले प्रसाद लाड यांची उमेदवारी कायम असल्याने निवडणूक बिनविरोध होणार नाही. नागपुरात भाजपाचे गिरीश व्यास व महापौर प्रवीण दटके यांनी अर्ज दाखल केला होता. व्यास हे अधिकृत उमेदवार असल्यामुळे दटके यांनी शुक्रवारीच अर्ज मागे घेतला होता. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार अशोकसिंग चव्हाण व नगरसेवक संजय महाकाळकर (डमी) यांनी अर्ज दाखल केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी २.४५ च्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडून नागपुरातील काँग्रेसची उमेदवारी मागे घ्या, असा आदेश आला. या आदेशाची अंमलबजावणी करीत चव्हाण व महाकाळकर यांचे अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध विजयी झाले. (प्रतिनिधी)पक्षादेशाचे पालन केले ...काँग्रेसकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ नव्हते. पराभव निश्चित होता. त्यानंतरही निवडणूक लढविली असती तर मोठा घोडेबाजर झाला असता. शेवटी काँग्रेसचा उमेदवारी अर्ज मागे घ्या, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेचे पालन करीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मुंबईत काय झाले याची आपल्याला माहिती नाही. - विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस