शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
3
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
4
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
5
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
6
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
7
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
8
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
9
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
10
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
11
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
12
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
13
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
14
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
15
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
16
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
17
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
18
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
19
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
20
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

भाजपाचा मुख्यमंत्री हेच शिवसेनेचे दुखणे

By admin | Updated: March 5, 2015 02:10 IST

सत्तेत सहभागी होऊन सतत टीका करीत राहायचे, हे शिवसेनेने टाळले पाहिजे; जनतेलाही ते आवडत नाही, असा सल्ला देतानाच महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री झाला हेच शिवसेनेचे मूळ दुखणे आहे,

दानवेंचा टोला : युतीत मतभेदाची दरी रुंदावलीमुंबई : सत्तेत सहभागी होऊन सतत टीका करीत राहायचे, हे शिवसेनेने टाळले पाहिजे; जनतेलाही ते आवडत नाही, असा सल्ला देतानाच महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री झाला हेच शिवसेनेचे मूळ दुखणे आहे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे २१ विद्यमान आमदार आणि दोन अपक्ष आमदार भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे सांगत दानवे यांनी सतत सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला सूचक इशारा दिला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे खा. दानवे गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार या खात्याचे ते सध्या राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांनी‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. शिवसेना सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेत आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता खा. दानवे म्हणाले, की आमच्याजवळ पुरेसे संख्याबळ नाही आणि त्यांना सत्तेशिवाय जमत नाही; त्यामुळे आम्ही एकत्र आलो. खरेतर हा संसार सुखाने चालला पाहिजे. त्यामुळे सेनेने सत्तेत राहून विरोधात बोलणे टाळले पाहिजे. सेनेशी सूर जुळत नसतील तर राष्ट्रवादीने देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा का घेतला नाही, असे विचारले असता भाजपा व सेनेचा मतदार एकच आहे. सत्तेकरिता कुणाशीही संगत केलेली मतदारांना पसंत पडत नाही, असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)आंधळा पाठिंबा नाहीभूसंपादन विधेयक असो की सरकारच्या अन्य कुठल्याही निर्णयाला आंधळा पाठिंबा देणार नाही, असा स्पष्ट इशारा सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. येत्या महापालिका निवडणुकांत एकहाती सत्ता मिळवण्याकरिता कामाला लागण्याचे आदेशही ठाकरे यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना दिले.शिवसेनेमुळे बैठक रद्दभाजपा व सेनेच्या नेत्यांमधील समन्वय समितीची बैठक गुरुवारी होणार होती. मात्र भूसंपादन विधेयक असो की मुंबईचा विकास आराखडा उद्धव ठाकरे यांनी सातत्याने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाने ही बैठक टाळल्याची चर्चा आहे. भाजपाचे नेते दिल्लीत असल्याने बैठक पुढे गेल्याचे दानवे यांनी सांगितले.शिवसेनेचं वागणं कोणालाच पसंत नाहीपक्ष फुटण्याच्या भीतीने शिवसेना सत्तेत आली की सत्तेत सहभागी होण्याची त्यांची काही अन्य गणिते आहेत, या प्रश्नाचे उत्तर शिवसेनाच देऊ शकेल. आता सतत टीका करीत राहण्याचं सेनेचं वागणं जनतेलाही पसंत नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा सूचक इशारा दानवे यांनी दिला. सुखी ‘संसारा’साठी सेनेने विरोध टाळावाआमच्याजवळ पुरेसे संख्याबळ नाही आणि त्यांना सत्तेशिवाय जमत नाही; त्यामुळे आम्ही एकत्र आलो. खरेतर आता हा संसार सुखाने चालला पाहिजे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत राहून विरोधात बोलणे टाळले पाहिजे.