शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भाजपाने बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 2, 2014 14:09 IST

गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपाने बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली

ऑनलाइन लोकमत
फलटण, दि. २ - गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपाला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते. 
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीसमोर सोन्याचं ताट वाढून ठेवलं होतं, शिवछत्रपतींचाही आम्हाला आशिर्वाद होता मात्र भाजपाने युती तोडत ही सोन्यासारखी संधी गमावली असेही ते म्हणाले. संकटकाळात शिवसेना नेहमी भाजपाच्या पाठीशी होती, मात्र चांगले दिवस आल्याचे दिसताचा भाजपाने लगेच नातं तोडलं. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी भाजपाने युती तोडल्याचा आरोप उद्धव यांनी केला. शिवसेना संपवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ राज्यात प्रचारासाठी येणार आहे, असेही ते म्हणाले.
अजित पवारांनी शेतक-यांची क्रूर थट्टा केल्याचे सांगत त्यांनी आघाडी सरकारवरही हल्लाबोल केला. सही करता येते हे दाखवण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाण जाहिरातबाजी करत असल्याचा टोमणाही त्यांनी मारला. आघाडी सरकारमुळे शेतक-यांच्या डोळ्यांत अश्रू असून तेच अश्रू आपण पुसणार असल्याचे ते म्हणाले.