शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपावर सेनेचा ‘अवकाळी’ हल्ला!

By admin | Updated: March 11, 2015 02:40 IST

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विधानसभेत शिवसेनेने आज फडणवीस सरकारला कठोर शब्दांत खडे बोल सुनावले

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विधानसभेत शिवसेनेने आज फडणवीस सरकारला कठोर शब्दांत खडे बोल सुनावले. त्यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली. अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील या सेनेच्या आमदारांनी घणाघाती भाषण केल्याने सत्ताधारी बाकांवर बरीच चुळबुळ झाली.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटावर विधानसभेत तातडीने चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधी पक्षांनी नियम ९७ आणि ५७ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सर्व विषय बाजूला ठेवून चर्चा सुरू करण्यात अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर भाजपा आमदारांनी २९३ अन्वये याच विषयावर चर्चा आणली. पण ती शिवसेनेने त्यांच्यावर उलटवली. विशेष म्हणजे या वेळी सभागृहात सेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री हजर नव्हते. त्यामुळे शिवसेनेने भाजपाचा हा सुनियोजित ‘कार्यक्रम’ केल्याची चर्चा विधिमंडळात रंगली.पाच मिनिटांच्या सभात्यागानंतर सभागृहात परत आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही चर्चेत सहभाग घेत सेनेच्या आमदारांना डिवचले. ‘सरकारला कधी जाब विचारणार?’ असा बाण छगन भुजबळ यांनी सोडला आणि तो नेमका सेनेच्या वर्मी लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीने उसाला ६ हजारांचा भाव दिला, तुम्ही त्यांच्यापेक्षा निदान दोनतीनशे रुपये तरी जास्तीचे द्या, कोणत्या तोंडाने आम्ही मतदारसंघात जायचे ते तरी सांगा, अशा शब्दांत आ. खोतकर यांनी सरकारवर हल्ला चढवला; तेव्हा विरोधी सदस्यांनी जोरजोरात बाके वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. सरकारी पक्षाच्या सदस्यांनी आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांचा असा सहभाग पाहून सत्ताधारी बाकावरील सदस्य चिडीचूप बसले होते. (विशेष प्रतिनिधी)