शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

भाजपावर सेनेचा ‘अवकाळी’ हल्ला!

By admin | Updated: March 11, 2015 02:40 IST

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विधानसभेत शिवसेनेने आज फडणवीस सरकारला कठोर शब्दांत खडे बोल सुनावले

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विधानसभेत शिवसेनेने आज फडणवीस सरकारला कठोर शब्दांत खडे बोल सुनावले. त्यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली. अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील या सेनेच्या आमदारांनी घणाघाती भाषण केल्याने सत्ताधारी बाकांवर बरीच चुळबुळ झाली.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटावर विधानसभेत तातडीने चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधी पक्षांनी नियम ९७ आणि ५७ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सर्व विषय बाजूला ठेवून चर्चा सुरू करण्यात अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर भाजपा आमदारांनी २९३ अन्वये याच विषयावर चर्चा आणली. पण ती शिवसेनेने त्यांच्यावर उलटवली. विशेष म्हणजे या वेळी सभागृहात सेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री हजर नव्हते. त्यामुळे शिवसेनेने भाजपाचा हा सुनियोजित ‘कार्यक्रम’ केल्याची चर्चा विधिमंडळात रंगली.पाच मिनिटांच्या सभात्यागानंतर सभागृहात परत आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही चर्चेत सहभाग घेत सेनेच्या आमदारांना डिवचले. ‘सरकारला कधी जाब विचारणार?’ असा बाण छगन भुजबळ यांनी सोडला आणि तो नेमका सेनेच्या वर्मी लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीने उसाला ६ हजारांचा भाव दिला, तुम्ही त्यांच्यापेक्षा निदान दोनतीनशे रुपये तरी जास्तीचे द्या, कोणत्या तोंडाने आम्ही मतदारसंघात जायचे ते तरी सांगा, अशा शब्दांत आ. खोतकर यांनी सरकारवर हल्ला चढवला; तेव्हा विरोधी सदस्यांनी जोरजोरात बाके वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. सरकारी पक्षाच्या सदस्यांनी आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांचा असा सहभाग पाहून सत्ताधारी बाकावरील सदस्य चिडीचूप बसले होते. (विशेष प्रतिनिधी)