शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांच्या याचिकेमागे भाजपा?

By admin | Updated: January 13, 2017 04:04 IST

ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी

अतुुल कुलकर्णी / मुंबईऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमागे बोलविते धनी भाजपा नेतेच असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. तर दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सरकारविरोधात मूग गिळून असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर थेट आरोप ठेवणारी याचिका अण्णा हजारे यांनी केली खरी; परंतु आधी तक्रार नोंदवा, असे न्यायालयाने बजावले. अलीकडच्या काळात अण्णांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले सूत जमले आहे. त्यातूनच ही याचिका पुढे आल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर याचिका सुनावणीला आली असती, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली असती.मराठा मोर्चामुळे सरकारविरोधी वातावरण तयार झाले, असे बोलले जात असतानाच नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. अन्य समाजाच्या लोकांनी मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान केले नाही, असा एक सूर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निघाल्याचे समजते. मुख्यमंत्री जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत; कारण त्यांना मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. दुर्दैवाने आमच्या पक्षात एकही नेता यावर मात करून ठाम भूमिका घेण्यास तयार नाही, सरकारच्या विरोधातबोलण्यासारखे असंख्य मुद्दे असताना आमच्या पक्षाचे नेते कोषात गेल्यासारखे गप्प बसून आहेत. कोणी फार तीव्रतेने मुद्दे मांडायला तयार नाही, सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकायला तयार नाही, कारण प्रत्येकाला आपल्या विरोधात चौकशीचे शुक्लकाष्ठ लागेल की काय, याची भीती आहे, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अनुकूल आहेत. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापीठावर शरद पवार पुण्यात दोन वेळा एकत्र आल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार रणनीती आखलेली असताना, दुसरीकडे आपापले गड कसे सांभाळायचे याच्या पलीकडे राज्याचा एकत्रित विचार कोणाकडेही नाही, अशी खदखद दोन्ही काँग्रेसमध्ये आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. प्रत्येकाला जिल्हे वाटप करून दिले आहेत, कामांचे वाटप सुरू आहे.