शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

अण्णांच्या याचिकेमागे भाजपा?

By admin | Updated: January 13, 2017 04:04 IST

ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी

अतुुल कुलकर्णी / मुंबईऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमागे बोलविते धनी भाजपा नेतेच असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. तर दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सरकारविरोधात मूग गिळून असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर थेट आरोप ठेवणारी याचिका अण्णा हजारे यांनी केली खरी; परंतु आधी तक्रार नोंदवा, असे न्यायालयाने बजावले. अलीकडच्या काळात अण्णांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले सूत जमले आहे. त्यातूनच ही याचिका पुढे आल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर याचिका सुनावणीला आली असती, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली असती.मराठा मोर्चामुळे सरकारविरोधी वातावरण तयार झाले, असे बोलले जात असतानाच नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. अन्य समाजाच्या लोकांनी मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान केले नाही, असा एक सूर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निघाल्याचे समजते. मुख्यमंत्री जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत; कारण त्यांना मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. दुर्दैवाने आमच्या पक्षात एकही नेता यावर मात करून ठाम भूमिका घेण्यास तयार नाही, सरकारच्या विरोधातबोलण्यासारखे असंख्य मुद्दे असताना आमच्या पक्षाचे नेते कोषात गेल्यासारखे गप्प बसून आहेत. कोणी फार तीव्रतेने मुद्दे मांडायला तयार नाही, सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकायला तयार नाही, कारण प्रत्येकाला आपल्या विरोधात चौकशीचे शुक्लकाष्ठ लागेल की काय, याची भीती आहे, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अनुकूल आहेत. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापीठावर शरद पवार पुण्यात दोन वेळा एकत्र आल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार रणनीती आखलेली असताना, दुसरीकडे आपापले गड कसे सांभाळायचे याच्या पलीकडे राज्याचा एकत्रित विचार कोणाकडेही नाही, अशी खदखद दोन्ही काँग्रेसमध्ये आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. प्रत्येकाला जिल्हे वाटप करून दिले आहेत, कामांचे वाटप सुरू आहे.