शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

अण्णांच्या याचिकेमागे भाजपा?

By admin | Updated: January 13, 2017 04:04 IST

ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी

अतुुल कुलकर्णी / मुंबईऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमागे बोलविते धनी भाजपा नेतेच असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. तर दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सरकारविरोधात मूग गिळून असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर थेट आरोप ठेवणारी याचिका अण्णा हजारे यांनी केली खरी; परंतु आधी तक्रार नोंदवा, असे न्यायालयाने बजावले. अलीकडच्या काळात अण्णांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले सूत जमले आहे. त्यातूनच ही याचिका पुढे आल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर याचिका सुनावणीला आली असती, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली असती.मराठा मोर्चामुळे सरकारविरोधी वातावरण तयार झाले, असे बोलले जात असतानाच नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. अन्य समाजाच्या लोकांनी मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान केले नाही, असा एक सूर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निघाल्याचे समजते. मुख्यमंत्री जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत; कारण त्यांना मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. दुर्दैवाने आमच्या पक्षात एकही नेता यावर मात करून ठाम भूमिका घेण्यास तयार नाही, सरकारच्या विरोधातबोलण्यासारखे असंख्य मुद्दे असताना आमच्या पक्षाचे नेते कोषात गेल्यासारखे गप्प बसून आहेत. कोणी फार तीव्रतेने मुद्दे मांडायला तयार नाही, सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकायला तयार नाही, कारण प्रत्येकाला आपल्या विरोधात चौकशीचे शुक्लकाष्ठ लागेल की काय, याची भीती आहे, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अनुकूल आहेत. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापीठावर शरद पवार पुण्यात दोन वेळा एकत्र आल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार रणनीती आखलेली असताना, दुसरीकडे आपापले गड कसे सांभाळायचे याच्या पलीकडे राज्याचा एकत्रित विचार कोणाकडेही नाही, अशी खदखद दोन्ही काँग्रेसमध्ये आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. प्रत्येकाला जिल्हे वाटप करून दिले आहेत, कामांचे वाटप सुरू आहे.