शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेना सरकार अपयशी

By admin | Updated: May 8, 2016 02:21 IST

दुष्काळाचे अनिष्ट चक्र भेदण्यासाठी दीर्घकालीन तसेच तातडीच्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, भाजपा-शिवसेना युतीकडून प्रत्यक्षात कुठलीही कामे होताना दिसत नाहीत

उस्मानाबाद : दुष्काळाचे अनिष्ट चक्र भेदण्यासाठी दीर्घकालीन तसेच तातडीच्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, भाजपा-शिवसेना युतीकडून प्रत्यक्षात कुठलीही कामे होताना दिसत नाहीत. हे शासन केवळ घोषणाबाज असून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे केली.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांशी चव्हाण यांनी संवाद साधला. त्यानंतर येथील सर्किट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. चव्हाण म्हणाले, कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्यास शेतकरी उत्सुक नाहीत. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्ज फेडण्याची ऐपत राहिलेली नाही. त्यामुळे शासनाने कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी कर्जमाफी द्यावी. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मात्र, पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे व खत खरेदी करण्यापुरतीही कुवत शेतकऱ्यांत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना विनामूल्य बियाणे व खताचा पुरवठा करावा.अधिकारी ऐकत नाहीत, असे खुद्द मुख्यमंत्रीच सांगत असतील तर जनतेने दाद कोणाकडे मागायची? जर अधिकारी ऐकत नसतील, त्यांना घरचा रस्ता का दाखवित नाहीत, असा सवाल चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)अनुदानातून १०० रुपयांची कपातजिल्हा बँकेकडून निराधारांच्या अनुदानातून प्रत्येकी शंभर रूपये कपात केले जात आहेत. बँकेची ही कृती चुकीची असल्याचे सांगत हे पैसे कोणाच्या खिश्यात जातात?, असे चव्हाण यांनी विचारले. सरकार पावसाची वाट बघतेयदिवसागणिक दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र स्वरूप धारण करीत आहे. त्यामुळे कर्जमाफीसोबतच अन्य उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, हे शासन पाऊस कधी पडेल त्याची वाट बघत आहे. पाऊस पडला की शेतकरी सर्व विसरतील, असे शासनकर्त्यांना वाटत असल्याचे चव्हाण म्हणाले.