शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजपा आणि रिपाइंची तुटली युती

By admin | Updated: February 6, 2017 18:54 IST

भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यांची राज्यात युती आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 6 - भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यांची राज्यात युती आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही ही युती कायम होती. परंतु नागपुरात रिपाइं (आ) ला भाजपने एकही जागा सोडली नसल्याने ही युती तोडण्याचा निर्णय रिपाइं (आ) च्या नागपुरातील पार्लमेंट्री बोर्डाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

जागा वाटपावरून सध्या सर्वच पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यातच मित्र पक्षांना समाधानकारक जागा न सुटल्याने तेसुद्धा प्रचंड नाराज आहेत. यात भाजपाचे मित्र पक्ष सर्वाधिक नाराज आहे. नागपुरात भाजपाची रिपाइं (आठवले) आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांच्याशी युती आहे. रिपाइं आठवले यांची राज्यस्तरावर भाजपासोबत युती आहे. नागपुरात १५ जागांचा प्रस्ताव रिपाइंतर्फे भाजपाला देण्यात आला होता. परंतु ऐन वेळेवर रिपाइंला केवळ एक जागा सोडण्यात आल्याचे भाजपातर्फे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत सांगण्यात आले आहे. सोडण्यात आलेल्या जागेवर ज्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे, ते उमेदवारही रिपाइं (आ)चे नसून भाजपाचेच आहेत. त्यामुळे रिपाइंला भाजपाने एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे रिपाइं (आ) च्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सन्मानजनक जागा सोडल्या तरच भाजपसोबत युती करू असे, असे रिपाइं (आ)च्या स्थानिक नेतृत्वातर्फे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सीताबर्डी येथील रिपाइं (आ)च्या शहर कार्यालयात नागपुरातील निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पार्लमेंट्री बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आर. एस. वानखेडे, प्रा. पवन गजभिये, राजन वाघमारे, हरीष जनोरकर, विनोद थुल, कांतीलाल पखिड्डे, भीमराव मेश्राम, सतीश तांबे आणि राजेश ढेंगरे उपस्थित होते. या बैठकीत भाजपाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. एकही जागा सुटली नसल्याने भाजपासोबत राहण्यात काही अर्थ नाही, असे यावेळी सर्वांनीच मते बनवली. त्यामुळे नागपुरात भाजपसोबत युती तोडण्याचा बोर्डाने निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल पक्ष श्रेष्ठींनाही कळविण्यात आले आहे. रिपाइं (आ)तर्फे ७ उमेदवारांनी उमेदवारीच अर्ज दाखल केले आहे. त्या उमेदवारांचा पूर्ण ताकदीने प्रचार करणे आणि भाजपाविरोधात प्रचार करण्याचा निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे.- भाजपाच्या चिन्हावर लढणाऱ्यास पक्षातून निलंबितरिपाइंचे उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, अशी भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली होती. त्यानुसार राज्यभरात जे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवित आहेत. त्यांनाही पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पार्लमेंट्री बोर्डने यावेळी जाहीर केले.- भाजपाने विश्वासघात केलाभाजपाने आमचा विश्वासघात केला आहे. त्यांनी युतीचा धर्म पाळलेला नाही. आम्हाला (रिपाइं आ) ला दोन जागा सोडण्यात आल्याचे भाजप वर्तमानपत्रात जाहीर करते. परंतु ते चुकीचे आहे. आम्हाला एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे आता नागपुरात युती राहिलेली नाही. आम्ही आमचे उमेदवार लढवणार आणि भाजपाविरोधात प्रचार करणार.राजन वाघमारेशहराध्यक्ष, रिपाइं (आ.)