शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी...

By admin | Updated: November 27, 2015 01:11 IST

गुजरातच्या लेखकांचा सूर : सहिष्णुता वाढीसाठी प्रयत्न, पुरस्कार वापसीतून भावना व्यक्त

कोल्हापूर : गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी आहे. सन २००२ नंतर तेथे विविध मार्गाने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडे पोषक वातावरण असल्यामुळे देशभर असहिष्णुतेची धार वाढते आहे, असा सूर गुजरातमधील लेखक, साहित्यिक यांच्यातून गुरुवारी येथील पत्रकार परिषदेत निघाला. पुरस्कार वापसी करून विचारवंत आपल्या भावना व्यक्त करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. सहिष्णुता आणि असहिष्णुता यासंबंधी देशभरात निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधी लोकभावना समजून घेण्यासाठी ‘दाक्षिणायन’ मोहिमेंतर्गत गुजरातमधील लेखकांचा जत्था येथे आला आहे. येथील गायन समाज देवल क्लबमध्ये अच्युतराव भांडारकर कलादालनात पत्रकार परिषदेत या साहित्यिकांनी आपले विचार मांडले. चित्रपट निर्माते परेश नायक (गुजरात) म्हणाले, गुजरातमध्ये जन्मलेल्या असहिष्णुतेने २००२ ते २०१५ पर्यंत टोक गाठले आहे. विचार स्वातंत्र्यावरच घाला घातला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर देशभर असहिष्णुतेची लाट पसरली आहे. सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी, विचारवंत असहिष्णुतेला विरोध करीत पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहोचवित आहेत.डॉ. गणेश देवी (गुजरात) म्हणाले, असहिष्णुतेसंबंधी निर्माण झालेल्या लोकभावना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांत गुजरातमधील आम्ही साहित्यिक दौरा करीत आहोत. गुजरात असहिष्णुतेची कार्यशाळा आहे. वेगळा विचार मांडणाऱ्या विचारवंतांची हत्या करणे चिंताजनक आहे. देशभरात असहिष्णुतेचे ढग गडद होत चालले आहेत. त्यामुळे साहित्यिक, विचारवंत, चित्रपट निर्माते, कष्ट आणि मूल्यांचा सन्मान म्हणून स्वीकारलेला पुरस्कार शासनाकडे परत करीत आहेत. पुरस्कार वापसीनंतर आता ज्याप्रमाणे आमिर खानवर आरोप, टीका होत आहे, त्याप्रमाणे साहित्यिकांवरही होत आहेत. मात्र, देश कोणा एका नेत्याचा किंवा पक्षाचा नाही. यावेळी अनिल जोशी (गुजरात), प्रवीण बांदेकर, गणेश विस्पुते (सावंतवाडी), प्राचार्य राजेंद्र कुंभार, संजीव खांडेकर (मुंंबई) यांनी विचार मांडले. यावेळी मेघा पानसरे, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव, उदय नारकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, गुजरातहून आलेले साहित्यिक डॉ. गणेश देवी, मनीष जानी, उत्तम परमार, कानजी पटेल, अनिल जोशी, परेश नायक यांनी सकाळी अ‍ॅड. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बिंदू चौकातील अ‍ॅड. पानसरे यांच्या कार्यालयास भेट दिली. (प्रतिनिधी)आरएसएस, भाजपचे असहिष्णुतेला प्रोत्साहनगुजरात नवनिर्माण आंदोलनाचे संस्थापक मनीष जानी म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून गुजरातमध्ये असहिष्णुता आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. त्यांच्या विरोधात बाहेर पडलेल्या बळिराजांचा आवाज दडपला जात आहे. असहिष्णुतेला आरएसएस आणि भाजप प्रोत्साहन देत आहेत. पानसरे यांच्या हत्येनंतर तीन दिवस बंद करणाऱ्या कोल्हापूरकरांना सलाम आहे. दबाव अन् दबावच...शासनाचा पुरस्कार तुम्ही परत केल्यानंतर शासन व अन्य घटकांकडून दबाव येत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना देवी म्हणाले, दबाव नसलेला एक मिनीटही नाही. जो भीतो तो क्षणाक्षणाला मरत असतो. ज्याला भीती नाही, तो मरत नाही. अशाप्रकारे दबावाला बळी न पडता आमचे काम सुरू आहे.