शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी...

By admin | Updated: November 27, 2015 01:11 IST

गुजरातच्या लेखकांचा सूर : सहिष्णुता वाढीसाठी प्रयत्न, पुरस्कार वापसीतून भावना व्यक्त

कोल्हापूर : गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी आहे. सन २००२ नंतर तेथे विविध मार्गाने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडे पोषक वातावरण असल्यामुळे देशभर असहिष्णुतेची धार वाढते आहे, असा सूर गुजरातमधील लेखक, साहित्यिक यांच्यातून गुरुवारी येथील पत्रकार परिषदेत निघाला. पुरस्कार वापसी करून विचारवंत आपल्या भावना व्यक्त करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. सहिष्णुता आणि असहिष्णुता यासंबंधी देशभरात निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधी लोकभावना समजून घेण्यासाठी ‘दाक्षिणायन’ मोहिमेंतर्गत गुजरातमधील लेखकांचा जत्था येथे आला आहे. येथील गायन समाज देवल क्लबमध्ये अच्युतराव भांडारकर कलादालनात पत्रकार परिषदेत या साहित्यिकांनी आपले विचार मांडले. चित्रपट निर्माते परेश नायक (गुजरात) म्हणाले, गुजरातमध्ये जन्मलेल्या असहिष्णुतेने २००२ ते २०१५ पर्यंत टोक गाठले आहे. विचार स्वातंत्र्यावरच घाला घातला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर देशभर असहिष्णुतेची लाट पसरली आहे. सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी, विचारवंत असहिष्णुतेला विरोध करीत पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहोचवित आहेत.डॉ. गणेश देवी (गुजरात) म्हणाले, असहिष्णुतेसंबंधी निर्माण झालेल्या लोकभावना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांत गुजरातमधील आम्ही साहित्यिक दौरा करीत आहोत. गुजरात असहिष्णुतेची कार्यशाळा आहे. वेगळा विचार मांडणाऱ्या विचारवंतांची हत्या करणे चिंताजनक आहे. देशभरात असहिष्णुतेचे ढग गडद होत चालले आहेत. त्यामुळे साहित्यिक, विचारवंत, चित्रपट निर्माते, कष्ट आणि मूल्यांचा सन्मान म्हणून स्वीकारलेला पुरस्कार शासनाकडे परत करीत आहेत. पुरस्कार वापसीनंतर आता ज्याप्रमाणे आमिर खानवर आरोप, टीका होत आहे, त्याप्रमाणे साहित्यिकांवरही होत आहेत. मात्र, देश कोणा एका नेत्याचा किंवा पक्षाचा नाही. यावेळी अनिल जोशी (गुजरात), प्रवीण बांदेकर, गणेश विस्पुते (सावंतवाडी), प्राचार्य राजेंद्र कुंभार, संजीव खांडेकर (मुंंबई) यांनी विचार मांडले. यावेळी मेघा पानसरे, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव, उदय नारकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, गुजरातहून आलेले साहित्यिक डॉ. गणेश देवी, मनीष जानी, उत्तम परमार, कानजी पटेल, अनिल जोशी, परेश नायक यांनी सकाळी अ‍ॅड. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बिंदू चौकातील अ‍ॅड. पानसरे यांच्या कार्यालयास भेट दिली. (प्रतिनिधी)आरएसएस, भाजपचे असहिष्णुतेला प्रोत्साहनगुजरात नवनिर्माण आंदोलनाचे संस्थापक मनीष जानी म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून गुजरातमध्ये असहिष्णुता आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. त्यांच्या विरोधात बाहेर पडलेल्या बळिराजांचा आवाज दडपला जात आहे. असहिष्णुतेला आरएसएस आणि भाजप प्रोत्साहन देत आहेत. पानसरे यांच्या हत्येनंतर तीन दिवस बंद करणाऱ्या कोल्हापूरकरांना सलाम आहे. दबाव अन् दबावच...शासनाचा पुरस्कार तुम्ही परत केल्यानंतर शासन व अन्य घटकांकडून दबाव येत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना देवी म्हणाले, दबाव नसलेला एक मिनीटही नाही. जो भीतो तो क्षणाक्षणाला मरत असतो. ज्याला भीती नाही, तो मरत नाही. अशाप्रकारे दबावाला बळी न पडता आमचे काम सुरू आहे.