शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी...

By admin | Updated: November 27, 2015 01:11 IST

गुजरातच्या लेखकांचा सूर : सहिष्णुता वाढीसाठी प्रयत्न, पुरस्कार वापसीतून भावना व्यक्त

कोल्हापूर : गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी आहे. सन २००२ नंतर तेथे विविध मार्गाने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडे पोषक वातावरण असल्यामुळे देशभर असहिष्णुतेची धार वाढते आहे, असा सूर गुजरातमधील लेखक, साहित्यिक यांच्यातून गुरुवारी येथील पत्रकार परिषदेत निघाला. पुरस्कार वापसी करून विचारवंत आपल्या भावना व्यक्त करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. सहिष्णुता आणि असहिष्णुता यासंबंधी देशभरात निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधी लोकभावना समजून घेण्यासाठी ‘दाक्षिणायन’ मोहिमेंतर्गत गुजरातमधील लेखकांचा जत्था येथे आला आहे. येथील गायन समाज देवल क्लबमध्ये अच्युतराव भांडारकर कलादालनात पत्रकार परिषदेत या साहित्यिकांनी आपले विचार मांडले. चित्रपट निर्माते परेश नायक (गुजरात) म्हणाले, गुजरातमध्ये जन्मलेल्या असहिष्णुतेने २००२ ते २०१५ पर्यंत टोक गाठले आहे. विचार स्वातंत्र्यावरच घाला घातला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर देशभर असहिष्णुतेची लाट पसरली आहे. सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी, विचारवंत असहिष्णुतेला विरोध करीत पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहोचवित आहेत.डॉ. गणेश देवी (गुजरात) म्हणाले, असहिष्णुतेसंबंधी निर्माण झालेल्या लोकभावना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांत गुजरातमधील आम्ही साहित्यिक दौरा करीत आहोत. गुजरात असहिष्णुतेची कार्यशाळा आहे. वेगळा विचार मांडणाऱ्या विचारवंतांची हत्या करणे चिंताजनक आहे. देशभरात असहिष्णुतेचे ढग गडद होत चालले आहेत. त्यामुळे साहित्यिक, विचारवंत, चित्रपट निर्माते, कष्ट आणि मूल्यांचा सन्मान म्हणून स्वीकारलेला पुरस्कार शासनाकडे परत करीत आहेत. पुरस्कार वापसीनंतर आता ज्याप्रमाणे आमिर खानवर आरोप, टीका होत आहे, त्याप्रमाणे साहित्यिकांवरही होत आहेत. मात्र, देश कोणा एका नेत्याचा किंवा पक्षाचा नाही. यावेळी अनिल जोशी (गुजरात), प्रवीण बांदेकर, गणेश विस्पुते (सावंतवाडी), प्राचार्य राजेंद्र कुंभार, संजीव खांडेकर (मुंंबई) यांनी विचार मांडले. यावेळी मेघा पानसरे, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव, उदय नारकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, गुजरातहून आलेले साहित्यिक डॉ. गणेश देवी, मनीष जानी, उत्तम परमार, कानजी पटेल, अनिल जोशी, परेश नायक यांनी सकाळी अ‍ॅड. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बिंदू चौकातील अ‍ॅड. पानसरे यांच्या कार्यालयास भेट दिली. (प्रतिनिधी)आरएसएस, भाजपचे असहिष्णुतेला प्रोत्साहनगुजरात नवनिर्माण आंदोलनाचे संस्थापक मनीष जानी म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून गुजरातमध्ये असहिष्णुता आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. त्यांच्या विरोधात बाहेर पडलेल्या बळिराजांचा आवाज दडपला जात आहे. असहिष्णुतेला आरएसएस आणि भाजप प्रोत्साहन देत आहेत. पानसरे यांच्या हत्येनंतर तीन दिवस बंद करणाऱ्या कोल्हापूरकरांना सलाम आहे. दबाव अन् दबावच...शासनाचा पुरस्कार तुम्ही परत केल्यानंतर शासन व अन्य घटकांकडून दबाव येत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना देवी म्हणाले, दबाव नसलेला एक मिनीटही नाही. जो भीतो तो क्षणाक्षणाला मरत असतो. ज्याला भीती नाही, तो मरत नाही. अशाप्रकारे दबावाला बळी न पडता आमचे काम सुरू आहे.