शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील पक्ष्यांचे होणार सर्वेक्षण!

By admin | Updated: December 23, 2015 02:32 IST

बीएनएचएसचा उपक्रम; पक्षी संवर्धनास होणार मदत.

विवेक चांदूरकर/ वाशिम : दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. यामागील कारणे व उपाय शोधण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) पुढाकार घेतला आहे. या सोसायटीच्या वतीने देशभरातील पक्ष्यांच्या नोंदी घेवून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यातून पक्ष्यांची कमी होणारी संख्या व त्यामागील कारणं स्पष्ट होण्यास मदत होईल. वाढते प्रदुषण, शहरीकरण व जंगलतोडीमुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या. माळढोक, तणमोरासारख्या काही पक्ष्यांची संख्या अत्यंत कमी असून, त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनाकडे शासन तसेच पक्षीमित्रांचे लक्ष आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहे; मात्र मोबाईल फोन टॉवर, वाढते शहरीकरण व प्रदुषणामुळे एरव्ही मोठय़ा प्रमाणात दिसणार्‍या चिमण्या, बुलबूल, कबूतरं, कावळे या पक्ष्यांचीही संख्या कमी होत आहे. त्यामुळे सामान्य पक्ष्यांच्या नोंदी घेण्याकरिता कॉमन बर्ड मॉनिटरींग प्रोग्राम (सीबीएमपी) अर्थात सामान्य पक्षी निरीक्षण उपक्रम बीएनएचएसच्या वतीने नियोजनबद्धरित्या सुरू आहे. बीएनएचएसचे प्रकल्प अधिकारी नंदकिशोर दुधे भारतातील संस्थांच्या मदतीने हा प्रकल्प राबविणार आहेत. याकरिता प्रत्येक जिल्ह्यात विविध पक्षीमित्रांची मदत घेण्यात येणार आहे. पक्ष्यांच्या नोंदी घेण्याकरिता ट्रान्झीट लाईन मेथडचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता गुगल अर्थ आणि जीआयएस या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जाणार आहे. जीआयएसच्या माध्यमातून देशभरात राज्यनिहाय ग्रीड टाकण्यात आले आहे. प्रत्येक ग्रीड २ बाय २ किमी असणार आहे. ट्रान्झीट लाईन टाकून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पक्षीमित्रांना वर्षातून तीनवेळा पक्ष्यांच्या नोंदी घ्याव्या लागणार आहेत. या नोंदी घेतल्यानंतर त्याची माहिती बीएनएचएसने दिलेल्या डाटा टेबलमध्ये भरून मुंबईला पाठवावी लागणार आहे. मुंबई येथे देशभरातून येणारा डाटा गोळा करण्यात येणार आहे. तीनही ऋतूंमध्ये घेणार नोंदी उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये पक्ष्यांची संख्या कमी जास्त होते. हिवाळ्यात विदेशातून अनेक पक्षी देशात स्थलांतर करतात, तसेच उन्हाळी स्थलांतर करणारेही काही पक्षी असतात. पावसाळ्यात काही पक्षी चातकासारखे निदर्शनास पडतात. प्रत्येक ऋतूमध्ये पक्ष्यांचे व्यवहार वेगवेगळे असतात. त्यामुळे या उपक्रमांतर्गत तीनही ऋतूंमध्ये पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात येणार असून, त्याविषयी नोंदी घेण्यात येणार आहे. नोंदीनंतर काढणार निष्कर्ष देशभरातून सामान्यत: आढळणार्‍या पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. काही वर्षे पक्ष्यांची संख्या, त्यांचा आढळ, त्यांचे व्यवहार याच्या नोंदी घेवून त्याचे अवलोकन केल्यानंतर पक्ष्यांची संख्या कमी होतेय का, तसेच त्यामागील कारणे आणि उपाय, याचा निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे. देशभरातील पक्ष्यांची नावे, संख्या याचीही आकडेवारी यानिमित्ताने जमा होणार आहे.