शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

शत्रूंच्या हालचालींवर ‘पंछी’ची नजर!

By admin | Updated: January 11, 2015 01:38 IST

जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भाग, बर्फाच्छादित प्रदेश असोत की राजस्थानमधील वाळवंट या भागात घुसखोरी करणाऱ्यांवर आता ‘पंछी’ करडी नजर ठेवणार आहे.

राहुल कलाल - पुणेजम्मू-काश्मीरमधील दुर्गम भाग, बर्फाच्छादित प्रदेश असोत की राजस्थानमधील वाळवंट या भागात घुसखोरी करणाऱ्यांवर आता ‘पंछी’ करडी नजर ठेवणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) अत्युच्च क्षमतेचे मानवविरहित विमान विकसित केले. त्यास ‘पंछी’ हे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलने चालणारे हे विमान अति उंचीवरील धावपट्टीवरही उतरू शकेल़सध्या लष्कराकडे मानवविरहित ‘निशांत’ विमान आहे. याच्या माध्यमातून शत्रूच्या भागात जाऊन टेहळणी करता येते. पण या विमानाची क्षमता अधिक नसल्याने ते अति दुर्गम भागात पोहोचू शकत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी ८ महिने संशोधन करून ‘पंछी’ या मानवविरहित विमानाची निर्मिती केली. आतापर्यंत लष्कराकडे असलेली मानवविरहित विमाने ही धावपट्टीवरून कधीच उडू शकत नव्हती. ती रिमोट कंट्रोलने खाली आणावी लागत होती. मात्र ‘पंछी’ धावपट्टीवरून उड्डाण करू शकणार आहे. त्यामुळे अति उंचीवर, डोंगरावर हे विमान सहजरीत्या उतरविणे शक्य होणार आहे.डीआरडीओच्या अ‍ॅरिनॉटिकल सिस्टीम विभागाचे महासंचालक डॉ. के. तमिळमणी म्हणाले, की गेल्या आठ महिन्यांपासून अ‍ॅरॉनॉटिकल डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंटमधील शास्त्रज्ञ यावर संशोधन करीत होते. त्यातून ‘पंछी’ या अत्याधुनिक मानवविरहित विमानाची निर्मिती झाली. याची क्षमता आतापर्यंतच्या इतर विमानांपेक्षा जास्त आहे आणि ते कंट्रोल करण्याची रेंजही वाढविण्यात आली आहे. हे दिवसा आणि रात्रीही टेहळणी करू शकेल. हिमवर्षाव, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत उड्डाणाची याची क्षमता आहे.युद्धातही टेहळणी करणार युद्ध सुरू असताना तेथील टेहळणी करण्याची क्षमता ‘पंछी’मध्ये आहे. शत्रूंच्या तोफांची अचूक माहिती हे विमान लष्कराला देऊ शकेल, असे तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. याचबरोबर उच्च क्षमतेची छायाचित्रे काढण्याचीही यात क्षमता आहे.