शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

आता जैवशेतीच तारणार!

By admin | Updated: April 21, 2015 00:21 IST

तज्ज्ञांची व्यक्त केली जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विस्ताराची गरज.

अकोला : जगात जैवतंत्रज्ञानावर आधारित शेतीचे दिवस आले आहेत. सर्वत्र या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे; परंतु या विषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास विदर्भाला ४४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आता पहिले शासकीय महाविद्यालय विदर्भाला मिळाले असून, पदवी अभ्याक्रमाची पहिली तुकडी २0१६-१७ मध्ये या महाविद्यालयातून बाहेर पडेल. विदर्भाची व्याप्ती बघता आणखी दोन महाविद्यालये हवी असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याबाबत प्रस्ताव तयार करण्याची गरज असल्याची तज्ज्ञांची मतं आहेत. जैवतंत्रज्ञानाचे क्षितिज दिवसागणिक वाढत असून, परजणुक प्रवेशित वाणनिर्मिती, जनुकीय चिन्हाच्या मदतीने पीक पैदास पद्धती आदी तंत्रज्ञानामुळे नवीन वाणांची निर्मिती जलदगतीने होण्यास मदत होत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कृषी जैवतंत्रज्ञानामध्ये प्रगत मनुष्यबळाची गरज भासणार आहे. तथापि, या आधुनिक तंत्रज्ञानापासून विदर्भातील विद्यार्थी अद्याप वंचित होते. मागील शैक्षिणक वर्षातच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मिळाले. यासाठी विद्यापीठाला ४४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. यवतमाळ येथे जैवतंत्रज्ञान पदवी महाविद्यालय सुरू असूून, सध्या ४0 विद्यार्थी जैवतंत्रज्ञानाचा आधुनिक अभ्यास येथे करीत आहेत.या विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान पदवी तर दिली जाईलच, शिवाय त्यांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर अभ्याक्रमाची सोय आहे. कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अकरा जिलंचा समावेश आहे. या जिलंचा मोठा परिसर, पिकांची विविधता व हवामानातील बदल आदी बाबी लक्षात घेता, कृषी विद्यापीठामध्ये जैवतंत्रज्ञानाचे घटक महाविद्यालय होणे गरजेचे होते. कृषी विद्यापीठानेदेखील यासाठी प्रस्ताव सादर केले होते; पण त्यासाठी बरीच वर्षे लागली. विदर्भाची हीच व्याप्ती लक्षात घेऊन पूर्व विदर्भ, वाशिम व अचलपूर येथे जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्याची गरज आहे. यासंदर्भात डॉ व्ही एम भाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विदर्भाची व्याप्ती बघता जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची आणखी गरज असल्याचे म्हटले.