शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

बाईकस्वारांचा हलगर्जीपणा जिवावर

By admin | Updated: February 2, 2015 08:56 IST

मुंबईच्या दक्षिण भागात असणारी सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पाहता या परिसरात मोठ्या

मुंबई : मुंबईच्या दक्षिण भागात असणारी सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पाहता या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे बाईकस्वार आणि चारचाकी वाहनचालकांचा प्रवास सुकर व्हावा आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळावी यासाठी जे.जे. पूल उभारला. मात्र या पुलावरून जाताना काही बाईकस्वारांनी हलगर्जीपणाचे दर्शन दिले आणि त्याचाच फटका अन्य बाईकस्वारांना बसत गेला. बाईकस्वारांच्या हलगर्जीपणामुळे २००२ ते २०१४पर्यंत ५२ बाईकस्वार आणि त्यांच्या सहकार्यांचे प्राण गेले.२00२ साली जे.जे. उड्डाणपूल उभारून बाईकस्वार आणि चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला. हा सर्वच वाहनांना फायदेशीर ठरणारा असल्याने त्याचा बाईकस्वार, चारचाकी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. मात्र या पुलावरून जाताना बाईकस्वारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्याचा फटका त्यांना आणि वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांनाही बसला. पुलावर मोठ्या प्रमाणात बाईकस्वारांचे अपघात होतानाच त्यात अनेकांचे प्राण जाऊ लागले. हे पाहता ३१ मार्च २०१० रोजी जे.जे. पूल बाईकस्वारांसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि १ एप्रिल २०१०पासून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र ही बंदी झुगारूनही या पुलावरून बाईकस्वार जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२ ते २०१४पर्यंत या पुलावर ५२ बाईकस्वारांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा जीव गेला असून, ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १८४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुरुवातीला असणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता ही बंदी घालण्यात आली मात्र त्यानंतरही बाईकस्वार बंदीकडे दुर्लक्ष करून रात्री आणि मध्यरात्री पुलावरून जात असल्याने त्यांनाही अपघातांना सामोरे जावे लागले. हे पाहता अपघातांचा आकडा अधिक असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)