शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
5
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
6
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
7
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
8
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
9
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
10
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
11
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
12
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
13
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
14
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
15
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
16
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
17
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
18
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
19
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
20
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप

बाईकस्वारांचा हलगर्जीपणा जिवावर

By admin | Updated: February 2, 2015 08:56 IST

मुंबईच्या दक्षिण भागात असणारी सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पाहता या परिसरात मोठ्या

मुंबई : मुंबईच्या दक्षिण भागात असणारी सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पाहता या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे बाईकस्वार आणि चारचाकी वाहनचालकांचा प्रवास सुकर व्हावा आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळावी यासाठी जे.जे. पूल उभारला. मात्र या पुलावरून जाताना काही बाईकस्वारांनी हलगर्जीपणाचे दर्शन दिले आणि त्याचाच फटका अन्य बाईकस्वारांना बसत गेला. बाईकस्वारांच्या हलगर्जीपणामुळे २००२ ते २०१४पर्यंत ५२ बाईकस्वार आणि त्यांच्या सहकार्यांचे प्राण गेले.२00२ साली जे.जे. उड्डाणपूल उभारून बाईकस्वार आणि चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला. हा सर्वच वाहनांना फायदेशीर ठरणारा असल्याने त्याचा बाईकस्वार, चारचाकी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. मात्र या पुलावरून जाताना बाईकस्वारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्याचा फटका त्यांना आणि वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांनाही बसला. पुलावर मोठ्या प्रमाणात बाईकस्वारांचे अपघात होतानाच त्यात अनेकांचे प्राण जाऊ लागले. हे पाहता ३१ मार्च २०१० रोजी जे.जे. पूल बाईकस्वारांसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि १ एप्रिल २०१०पासून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र ही बंदी झुगारूनही या पुलावरून बाईकस्वार जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२ ते २०१४पर्यंत या पुलावर ५२ बाईकस्वारांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा जीव गेला असून, ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १८४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुरुवातीला असणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता ही बंदी घालण्यात आली मात्र त्यानंतरही बाईकस्वार बंदीकडे दुर्लक्ष करून रात्री आणि मध्यरात्री पुलावरून जात असल्याने त्यांनाही अपघातांना सामोरे जावे लागले. हे पाहता अपघातांचा आकडा अधिक असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)