शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

जिद्दीच्या जोरावर ठरल्या बिहारच्या पहिल्या महिला रेल्वेचालक

By admin | Updated: March 8, 2016 00:50 IST

सामान्य जीवन तर सारेच जगतात... मात्र, वेगळे काहीतरी करण्याची... इतरांपेक्षा स्वत:ला असामान्य घडविण्याची, सिद्ध करण्याची तिची जिद्द महत्त्वाची ठरली. सोलापूर रेल्वे विभागातील एकमेव महिला

बारामती : सामान्य जीवन तर सारेच जगतात... मात्र, वेगळे काहीतरी करण्याची... इतरांपेक्षा स्वत:ला असामान्य घडविण्याची, सिद्ध करण्याची तिची जिद्द महत्त्वाची ठरली. सोलापूर रेल्वे विभागातील एकमेव महिला रेल्वेचालक असणारी ३५ वर्षीय अनिता राजीव राज-यादव सर्वसामान्यांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. बिहारमधील त्या पहिल्या महिला रेल्वेचालक यापूर्वीच ठरल्या आहेत. अनिता या मूळच्या बिहार राज्यातील राहिवासी आहेत. त्यांचे वडील अभियंता आहेत. वडिलांसह कु टुंबीयांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’मधील पदविका मिळविली. त्यासाठी त्यांनी झारखंड येथे जाऊन शिक्षण घेतले. लहानपणी टीव्हीवर यशस्वी ‘सेलीब्रिटी’ ना पाहणे त्यांचा छंद होता. याच छंदातून त्यांनी आजची वेगळी वाट निवडली. या वाटेवर त्यांनी ‘बिहारची पहिली महिला रेल्वेचालक’ ही ओळख मिळविली आहे.रेल्वे चालविताना अनेक जण आश्चर्याने कौतुकाने पाहतात. आई, वडील, पती, सासूसह सासरच्या मंडळींना त्यांच्या कामाचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे धाडस दुणावते. कामाचा हुरुप वाढतो, असे अनिता आवर्जून सांगतात. त्यांची सासू बिहारच्या आरोग्य सेवेत आहेत. त्या सुनेच्या कामाविषयी त्यांचे छायाचित्र दाखवून माहिती देतात. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याचे अधिक साहस येते. त्यांचे पतीदेखील ‘बिझनेसमन’ आहेत. त्यांना ६ वर्षांची मुलगी आहे.> एक को देखके दस लडकियाँ आगे बढेगीया क्षेत्रात येण्याबाबत मुली फारशा इच्छुक नाहीत. येथील करिअरविषयी माहिती नसल्याने त्यांच्यामध्ये अनास्था आहे. या पार्श्वभूमीवर अनिता यांनी केलेले आवाहन मुलींना दिशादर्शक ठरावे. ‘इन्सान हिम्मत करे तो कुछ भी हो सकता है. लडकियाँ आगे बढे, और समेटले ये मोका. एक को देखके दस लडकियाँ आगे बढेगी. > ‘मैं अपनी जिद पे आयी हूँ’...बारामतीच्या रेल्वे स्थानकावर त्या मालवाहतूक रेल्वेतून ३६०० टन माल घेऊन आल्या होत्या. या वेळी त्यांच्याशी संवाद साधला. ‘मै अपनी जिद पे आयी हूँ’ असे त्या ‘लोकमत’ शी बोलताना सुरुवातीलाच सांगतात. रेल्वेच्या परीक्षेलादेखील मोजक्याच मुली होत्या. निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी त्यांच्यासमवेत एक-दोन मुलीच होत्या. अवघड असूनही त्यांनी मोठ्या जिद्दीने, परिश्रमाने हे प्रशिक्षण भुसावळ येथे पूर्ण केले. त्यानंतर त्या सोलापूर रेल्वे विभागात दौंड (जि. पुणे) येथे सहायक रेल्वेचालक पदावर रुजू होऊन स्वत:ला सिद्ध केले.बिहारची कर्मभूूमी सोडून नोकरीनिमित्त त्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत. रेल्वे चालविण्याचे तंत्र त्यांनी जिद्दीने आत्मसात केले. वास्तविक महिला म्हणून त्यांना ‘आॅफिस’काम रेल्वे प्रशासन सहजपणे देऊ शकते. मात्र, त्यांना सहज, सोपे जीवन मान्य नाही. त्यांनी ही ‘ड्युटी’आवर्जून मागवून घेतली आहे. आता ७ वर्षांच्या अनुभवानंतर त्या स्वत: रेल्वेचालक म्हणून काम पाहत आहेत. मालवाहतूक, पॅसेंजर रेल्वे त्या सराईतपणे चालवितात.