शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदे मिळतात हीच मोठी शोकांतिका - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:52 IST

देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.

मुंबई : देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा स्वागत व अंमलबजावणी’ ही राज्य परिषद झाली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. अंनिसला त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सर्वार्थाने मदत करेल, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले.शिवसेनेच्या उपनतेत्या आमदार नीलम गोºहे म्हणाल्या की, कायदा राबविताना सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे़आपापल्या विभागातीलप्रत्येक पोलीस स्टेशनवरीलअधिकारी व शिपाई यांच्यापर्यंत आजची ही कायद्याची पुस्तिका पोहोचली पाहिजे़हा कायदा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक वर्षाची प्रचार यात्रा काढणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.ही यात्रा १ मे महाराष्ट्र दिनी मुंबईहून सुरू होऊन सर्व जिल्ह्यातून नागपूर येथे १ मे २०१९ ला संपेल. तीन वर्षांत समाजसुधारणेमधे अग्रणी असलेला महाराष्ट्र जातपंचायतमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.परिषेदला फेडरेशन आॅफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे नरेंद्र नायक तसेच पंजाब, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड येथील प्रतिनिधी उपस्थित होते. जातपंचायतीच्या मनमानीने बाधित व्यक्तींची सुटका करून प्रतिकात्मक रूपात परिषदेचे उद्घाटन झाले. बरखास्त केलेल्या १३ जातपंचायतींच्या प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी कायदाविषयक चित्रमय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.- केवळ कायदा करून आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही. जोपर्यंत समाजमन हा बदल स्वीकारत नाही तोवर अविरत काम करावे लागेल. समाजबदलासाठी उत्साहाने काम करण्यास तयार असलेला आजचा मेळावा बघून आज मला निवांत झोप लागेल, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भावना मांडली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे