शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

By admin | Updated: November 9, 2016 03:08 IST

विधान परिषद, महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना अचानकपणे १००० व ५०० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने

पुणे : विधान परिषद, महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना अचानकपणे १००० व ५०० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. निवडणुका लढविण्यासाठी ज्यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करून ठेवली त्यांच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. आता काय करायचे हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. काळा पैसाच बाद केल्याने या निवडणुकांमध्ये पैशांचा धूर काढून त्या लढविणे अवघड बनले असून यामुळे पैशांच्या जोरावर निवडणुका लढविण्याचे मनोरे रचणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. यामुळे सर्वच प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत. निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना खर्च करण्यासाठी विशिष्ट मर्यादा ठरवून दिली जाते, मात्र काही अपवाद वगळता राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून याचे पालन केले जात नाही. आयोगाच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पट पैसे खर्च होतात. राजकीय नेत्यांकडून कमावलेला पैसा हा प्रामुख्याने ठेकेदाराने दिलेला ब्लॅक मनी असतो, बहुतांशदा तो रोख स्वरूपातच असतो. निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांवर, प्रचारावर होणारा खर्च बऱ्याचदा दाखविता येत नाही, त्यासाठी रोख स्वरूपातच पैसे खर्च केले जातात. त्यामुळे राजकीय नेत्यांकडे रोख रक्कम प्रचंड प्रमाणात असते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर ती आणखीनच जास्त प्रमाणात अनेकांनी जमा करून ठेवली होती. त्या सगळ्यांची आता मोठी गोची झाली आहे. कार्यकर्त्यांच्या नावावर नोटा बदलून घेण्याचा एक पर्याय राजकीय नेत्यांकडे उपलब्ध असला तरी मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम बदलून घेणे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये पैशांचा वापर खूपच कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)