शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साखर कारखान्यांच्या खरेदी घोटाळ्यात बडे नेते गोत्यात

By admin | Updated: January 3, 2017 23:58 IST

डबघाईला आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन वरील मलई खाणारे बडे नेते चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई : डबघाईला आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन वरील मलई खाणारे बडे नेते चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी या सर्व बड्या नेत्यांवर एफआआयआर नोंदवण्याची व या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजु शेट्टी यांच्या याचिकेमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे दोन्ही सुपुत्र निखील आणि सारंग गडकरी, तसेचपंकज व समीर भुजबळ, एकनाथ खडसेंच्या पत्नी, अशोक चव्हाणांचे जवळचे नातेवाईक आणि अजित पवार व त्यांचे नातेवाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना डबघाईस आणून अल्पदरात विकत घेऊन स्वत:चे खिसे गरम करण्याचा सपाटा राजकारण्यांनी लावला आहे. त्यात काही बडे नेते प्रत्यक्ष सहभागी नसले तरी त्यांचे सख्खे नातेवाईक किंवा त्यांच्या कार्यालयातील बड्या अधिकाऱ्याच्या नावे हे कारखाने खरेदी करून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावण्यात येत आहे आणि गरीब शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेणाऱ्या संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर एफआयआर नोंदवावा तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारला विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका खासदार राजू शेट्टी यांनी अ‍ॅड. सतीश बोरुळकर, योगेश पांडे आणि अ‍ॅड. संदीप कोरेगावे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली आहे.याचिकेनुसार, साखर कारखाने चालवण्याच्या नावाखाली बडे नेतेमंडळी कोट्यवधी रुपयांचे कर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतात. परंतु, कारखाने डबघाईला आल्याचे दाखवून कर्जाची परतफेड करत नाही. त्यामुळे या कर्जाची वसुली करण्यासाठी संबंधित कायद्यांतर्गत डबघाईला आलेल्या साखर कारखान्याच्या संपत्तीची मोजदाद करते. त्यांची किंमत लावते. सहकारी बँक जाणुनबुजून संबंधित साखर कारखान्यांच्या संपत्ती किंमत वास्तविक असलेल्या किंमतीपेक्षा कमी लावते. खरेदी करणारी कंपनी आणि बँकेचे अधिकारी जाणुनबुजून असा प्रकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी याचिकेद्वारे केला आहे.‘अंबादेवी सहकारी साखर कारण्याची किंमत १०० कोटी रुपये असतानाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा कारखाना अवघ्या १५ कोटी रुपयांना मुंबईच्या कायनेटीक प्रट्रोलियम प्रा. लि. ला विकला. अशाच प्रकारे राज्यातील अनेक साखर कारखान्यांची किंमत कमी लावून शेतकऱ्यांना फसवण्यात आले. याबद्दल पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी काहीही दखल घेतली नाही. याबाबतीत प्राथमिक चौकशी करण्यात आली व चौकशीअंती दखलपात्र गुन्हा असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही,’ असे शेट्टी यांनी याचिकेत म्हटले आहे. अशासंदर्भातील जनहित याचिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्याने बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या याचिकेवरील सुनावणी याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)