शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

साखर कारखान्यांच्या खरेदी घोटाळ्यात बडे नेते गोत्यात

By admin | Updated: January 3, 2017 23:58 IST

डबघाईला आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन वरील मलई खाणारे बडे नेते चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई : डबघाईला आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन वरील मलई खाणारे बडे नेते चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी या सर्व बड्या नेत्यांवर एफआआयआर नोंदवण्याची व या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजु शेट्टी यांच्या याचिकेमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे दोन्ही सुपुत्र निखील आणि सारंग गडकरी, तसेचपंकज व समीर भुजबळ, एकनाथ खडसेंच्या पत्नी, अशोक चव्हाणांचे जवळचे नातेवाईक आणि अजित पवार व त्यांचे नातेवाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना डबघाईस आणून अल्पदरात विकत घेऊन स्वत:चे खिसे गरम करण्याचा सपाटा राजकारण्यांनी लावला आहे. त्यात काही बडे नेते प्रत्यक्ष सहभागी नसले तरी त्यांचे सख्खे नातेवाईक किंवा त्यांच्या कार्यालयातील बड्या अधिकाऱ्याच्या नावे हे कारखाने खरेदी करून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावण्यात येत आहे आणि गरीब शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेणाऱ्या संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर एफआयआर नोंदवावा तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारला विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका खासदार राजू शेट्टी यांनी अ‍ॅड. सतीश बोरुळकर, योगेश पांडे आणि अ‍ॅड. संदीप कोरेगावे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली आहे.याचिकेनुसार, साखर कारखाने चालवण्याच्या नावाखाली बडे नेतेमंडळी कोट्यवधी रुपयांचे कर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतात. परंतु, कारखाने डबघाईला आल्याचे दाखवून कर्जाची परतफेड करत नाही. त्यामुळे या कर्जाची वसुली करण्यासाठी संबंधित कायद्यांतर्गत डबघाईला आलेल्या साखर कारखान्याच्या संपत्तीची मोजदाद करते. त्यांची किंमत लावते. सहकारी बँक जाणुनबुजून संबंधित साखर कारखान्यांच्या संपत्ती किंमत वास्तविक असलेल्या किंमतीपेक्षा कमी लावते. खरेदी करणारी कंपनी आणि बँकेचे अधिकारी जाणुनबुजून असा प्रकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी याचिकेद्वारे केला आहे.‘अंबादेवी सहकारी साखर कारण्याची किंमत १०० कोटी रुपये असतानाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा कारखाना अवघ्या १५ कोटी रुपयांना मुंबईच्या कायनेटीक प्रट्रोलियम प्रा. लि. ला विकला. अशाच प्रकारे राज्यातील अनेक साखर कारखान्यांची किंमत कमी लावून शेतकऱ्यांना फसवण्यात आले. याबद्दल पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी काहीही दखल घेतली नाही. याबाबतीत प्राथमिक चौकशी करण्यात आली व चौकशीअंती दखलपात्र गुन्हा असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही,’ असे शेट्टी यांनी याचिकेत म्हटले आहे. अशासंदर्भातील जनहित याचिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्याने बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या याचिकेवरील सुनावणी याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)