शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बुलडाण्यातील एक मोठे, चार मध्यम व २४ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो

By admin | Updated: October 4, 2016 18:39 IST

मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पासह नदी, नाले, बंधा-यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सततधार पावसामुळे काही

- हर्षनंदन वाघ/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 04 - मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पासह नदी, नाले, बंधा-यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सततधार पावसामुळे काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून त्यात जिल्ह्यातील मोठे १, मध्यम ४ व लघु २४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्प परिसरातील उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.
 सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात, परिसरातील गावाची पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी जिल्ह्यात मोठे ३, मध्यम ७ व  ८१ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पातील संकलीत साठा ५३५.५० दलघमी असून आतापर्यंत ३५६.५० दलघमी साठा आला आहे. त्याची टक्केवारी ६६.५५ आहे. दरवर्षी आतापर्यंत पावसाच्या लहरीपणामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाला होता. तर अनेक प्रकल्प ठोरडे पडले होते. मात्र यावर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाला, तसेच परतीच्या पावसाने मागिल आठवड्यात ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दमदार हजेरी लावल्याने व नियमित सततधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प
ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यात मोठ्या नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या ३ प्रकल्पापैकी खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. मध्यम पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या ७ प्रकल्पापैकी पलढग, मस, कोराडी व उतावळी हे ४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर ८१ लघु प्रकल्पापैकी २४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्प परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे.
 
ओव्हरफ्लो झालेले २४ लघु प्रकल्प
 जिल्ह्यातील २४ लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यात चिखली, झरी बु.,मासरूळ,  कंडारी, पिंप्री गवळी, रायपूर, मिसाळवाडी,  गारडगाव, केशवशिवणी, अंचरवाडी-१, अंचरवाडी-२, पिंपळगाव चिलम,  टाकळी, हिवरखेड-१, गणेशपूर,
हिवरखेड-३ पिंपळगाव नाथ, पिंपळनेर,पळशी,  धनवटपूर, कळमेश्वर, कंडारी, ढोरपगाव, विद्रुपा यांचा समावेश आहे.
 
सोयाबीन, कापूस पिकाला फटका
जिल्ह्यात मागिल दोन आठवड्यापासून दमदार पाऊस होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस पिकाला होणार आहे. सोयाबीन सोंगणीला आली असून काही शेतात सोयाबीनचा शेंगा  जमिनीवर पडत आहेत. मात्र पावसामुळे त्या काढता
येत नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर मोताळा तालुक्यासह कपाशी पेरा असलेल्या भागात कपाशीच्या कैºया किड पडून सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घटन येण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर पिकांना त्याचा कमी-जास्त प्रमाणात फटका बसणार असल्याचा अंदाज शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.