शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

फडणवीस सरकारपुढे मोठे आव्हान

By admin | Updated: November 29, 2014 00:37 IST

आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले.

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा होता आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या जनभावनेचे चित्र दिसून आले. आता कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले. 
   रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘गुरुवार सभा’ उपक्रमांतर्गत व्याख्यानात ‘नव्या सरकारपुढील आव्हाने’ विषयावर आपले विचार मांडताना रायकर यांनी जुन्या राजवटीतील परिस्थितीचा आढावा घेतला. विधानसभेत बहुमत सिद्ध करणो हा सरकारसमोरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कुबडय़ा वापरून सरकार फार काळ तग धरू शकणार नाही. पवारांना आपला पक्ष सध्या स्थिरस्थावर करायचा आहे. झालेली पडझड दुरुस्त करून निवडणुकांना तोंड देण्याइतपत तयारी करण्यासाठी पवारांना उसंत हवी आहे. तेवढा वेळ काढण्यापुरताच पवारांनी नव्या सरकारला पाठिंबा दिला आहे. पवारांचा धूर्तपणा लक्षात घेता देवेंद्र फडणवीस सरकारला त्यांच्या भरवशावर फार काळ अवलंबून चालणार नाही, असे ते म्हणाले.
शिवसेना आणि भाजपा यांच्यात चालू असलेल्या चर्चेच्या गु:हाळाचा लोकांना कंटाळा आला आहे. या दोन्ही पक्षांनी एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून निर्णय घ्यावा, असे सांगून रायकर म्हणाले की, राष्ट्रवादी-कॉँग्रेसपेक्षा शिवसेनेचा पाठिंबा घेणो सरकारला केव्हाही अधिक सोयीचे व हितकारक ठरेल. दिवंगत बाळासाहेब ठाकरे किंवा गोपीनाथ मुंडे हे दोन्ही नेते आज असते तर आज ही अस्थिर स्थिती निर्माण झालीच नसती. या दोन्ही नेत्यांनी कमीत कमी वेळात निर्णय घेतला असता, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळ आणि बिघडलेली आर्थिक स्थिती हे दोन महत्त्वाचे प्रश्न सध्या नव्या सरकारला हाताळावे लागणार आहेत. दुष्काळाचा प्रश्न उग्र होत असून सध्या विरोधात असलेली शिवसेना या प्रश्नावर वातावरण तापवीत आहे. अशा स्थितीत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा वेळी धडाडीने निर्णय घेऊन सरकारने आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले पाहिजे, असे रायकर म्हणाले. (प्रतिनिधी)