शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

फडणवीस सरकारपुढे मोठे आव्हान

By admin | Updated: November 29, 2014 00:37 IST

आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले.

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा होता आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या जनभावनेचे चित्र दिसून आले. आता कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले. 
   रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘गुरुवार सभा’ उपक्रमांतर्गत व्याख्यानात ‘नव्या सरकारपुढील आव्हाने’ विषयावर आपले विचार मांडताना रायकर यांनी जुन्या राजवटीतील परिस्थितीचा आढावा घेतला. विधानसभेत बहुमत सिद्ध करणो हा सरकारसमोरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कुबडय़ा वापरून सरकार फार काळ तग धरू शकणार नाही. पवारांना आपला पक्ष सध्या स्थिरस्थावर करायचा आहे. झालेली पडझड दुरुस्त करून निवडणुकांना तोंड देण्याइतपत तयारी करण्यासाठी पवारांना उसंत हवी आहे. तेवढा वेळ काढण्यापुरताच पवारांनी नव्या सरकारला पाठिंबा दिला आहे. पवारांचा धूर्तपणा लक्षात घेता देवेंद्र फडणवीस सरकारला त्यांच्या भरवशावर फार काळ अवलंबून चालणार नाही, असे ते म्हणाले.
शिवसेना आणि भाजपा यांच्यात चालू असलेल्या चर्चेच्या गु:हाळाचा लोकांना कंटाळा आला आहे. या दोन्ही पक्षांनी एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून निर्णय घ्यावा, असे सांगून रायकर म्हणाले की, राष्ट्रवादी-कॉँग्रेसपेक्षा शिवसेनेचा पाठिंबा घेणो सरकारला केव्हाही अधिक सोयीचे व हितकारक ठरेल. दिवंगत बाळासाहेब ठाकरे किंवा गोपीनाथ मुंडे हे दोन्ही नेते आज असते तर आज ही अस्थिर स्थिती निर्माण झालीच नसती. या दोन्ही नेत्यांनी कमीत कमी वेळात निर्णय घेतला असता, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळ आणि बिघडलेली आर्थिक स्थिती हे दोन महत्त्वाचे प्रश्न सध्या नव्या सरकारला हाताळावे लागणार आहेत. दुष्काळाचा प्रश्न उग्र होत असून सध्या विरोधात असलेली शिवसेना या प्रश्नावर वातावरण तापवीत आहे. अशा स्थितीत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा वेळी धडाडीने निर्णय घेऊन सरकारने आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले पाहिजे, असे रायकर म्हणाले. (प्रतिनिधी)