शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारपुढे मोठे आव्हान

By admin | Updated: November 29, 2014 00:37 IST

आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले.

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा होता आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या जनभावनेचे चित्र दिसून आले. आता कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले. 
   रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘गुरुवार सभा’ उपक्रमांतर्गत व्याख्यानात ‘नव्या सरकारपुढील आव्हाने’ विषयावर आपले विचार मांडताना रायकर यांनी जुन्या राजवटीतील परिस्थितीचा आढावा घेतला. विधानसभेत बहुमत सिद्ध करणो हा सरकारसमोरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कुबडय़ा वापरून सरकार फार काळ तग धरू शकणार नाही. पवारांना आपला पक्ष सध्या स्थिरस्थावर करायचा आहे. झालेली पडझड दुरुस्त करून निवडणुकांना तोंड देण्याइतपत तयारी करण्यासाठी पवारांना उसंत हवी आहे. तेवढा वेळ काढण्यापुरताच पवारांनी नव्या सरकारला पाठिंबा दिला आहे. पवारांचा धूर्तपणा लक्षात घेता देवेंद्र फडणवीस सरकारला त्यांच्या भरवशावर फार काळ अवलंबून चालणार नाही, असे ते म्हणाले.
शिवसेना आणि भाजपा यांच्यात चालू असलेल्या चर्चेच्या गु:हाळाचा लोकांना कंटाळा आला आहे. या दोन्ही पक्षांनी एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून निर्णय घ्यावा, असे सांगून रायकर म्हणाले की, राष्ट्रवादी-कॉँग्रेसपेक्षा शिवसेनेचा पाठिंबा घेणो सरकारला केव्हाही अधिक सोयीचे व हितकारक ठरेल. दिवंगत बाळासाहेब ठाकरे किंवा गोपीनाथ मुंडे हे दोन्ही नेते आज असते तर आज ही अस्थिर स्थिती निर्माण झालीच नसती. या दोन्ही नेत्यांनी कमीत कमी वेळात निर्णय घेतला असता, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळ आणि बिघडलेली आर्थिक स्थिती हे दोन महत्त्वाचे प्रश्न सध्या नव्या सरकारला हाताळावे लागणार आहेत. दुष्काळाचा प्रश्न उग्र होत असून सध्या विरोधात असलेली शिवसेना या प्रश्नावर वातावरण तापवीत आहे. अशा स्थितीत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा वेळी धडाडीने निर्णय घेऊन सरकारने आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले पाहिजे, असे रायकर म्हणाले. (प्रतिनिधी)