शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

भुजबळांच्या एमईटीवर ‘भूखंडकृपा’

By admin | Updated: April 15, 2016 02:42 IST

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या एमईटी संस्थेला ५० हजार चौरस मीटर इतकी जमीन केवळ ९ लाख ३८ हजार रुपयांत देण्यात आली. वित्त विभागाच्या सचिवांनी आक्षेप नोंदविलेला

- यदु जोशी,  मुंबईमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या एमईटी संस्थेला ५० हजार चौरस मीटर इतकी जमीन केवळ ९ लाख ३८ हजार रुपयांत देण्यात आली. वित्त विभागाच्या सचिवांनी आक्षेप नोंदविलेला असतानाही तत्कालिन वित्तमंत्र्यांनी रेडीरेकनरनुसार ९ कोटी ३९ लाख रुपये किंमत असलेली ही जागा केवळ ९ लाख ८ हजार रुपयांत एमईटीला दिली, असा ठपका लोकलेखा समितीने ठेवला आहे. ४ डिसेंबर २००८ रोजी हा निर्णय झाला तेव्हा जयंत पाटील हे वित्त मंत्री होते. मुळात किरकोळ खनिजांच्या उत्खननासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकरता नाशिकजवळची (मौजे गोवर्धन) ९१ हजार ३०० चौरस मीटर जमीन राखून ठेवण्यात आली होती. त्या जमिनीची मे २००० मध्ये एमईटीचे एक विश्वस्त समीर भुजबळ यांनी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालय सुरू करण्यासाठी मागणी केली. नोव्हेंबर २००३ मध्ये प्रारंभी यापैकी ४१३०० चौरस मीटर जमीन खाणकामाऐवजी शिक्षणासाठी १.५५ लाख भोगवटा किंमतीवर एमईटीला देण्यात आली. त्यानंतर या महाविद्यालयाच्या विस्तारासाठी समीर भुजबळ यांनी उरलेल्या ५० हजार चौरस मीटर जागेची मागणी केली. एमईटीला नाशिक जिल्ह्यात १.५३ लाख चौरस मीटर जमीन आधीच दिलेली असतानाही सवलतीच्या दराने पुन्हा जमीन देण्याची गरज नाही, असे सांगत वित्त विभागाने २१ नोव्हेंबर २००८ रोजी आक्षेप घेतला. तसेच, जमीन द्यायचीच होती तर २००८ मध्ये बाजारभावाने द्यायला हवी होती, असाही स्पष्ट अभिप्राय दिला. त्याचवेळी महसूल विभागाने वित्त विभागाला कळविले होते की, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या धोरणानुसार विनाअनुदानित सोसायटीला सवलतीच्या दरात जमीन देणे म्हणजे सोसायटीला एकप्रकारे अनुदान देण्यासारखेच आहे; जे योग्य नाही. वित्त सचिवांनी आक्षेप घेऊन देखील वित्तमंत्र्यांनी ४ डिसेंबर २००८ रोजी महसूल विभागाने पूर्वी केल्याप्रमाणे त्याच पद्धतीत सवलतीच्या दराने जमीन देण्याबाबतच्या शिफारशी मान्य केल्या. रेडिरेकनरनुसार ९.३९ कोटी रुपये जमिनीची किंमत असताना एमईटीला ५० हजार चौरस मीटर जागा ही केवळ ९ लाख ८ हजार रुपयांत देण्यातआली.ही जमीन एमईटीला दिल्यानंतर विशिष्ट कालावधीत त्या जमिनीवर बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र, या अटीचाही एमईटीने भंग केला, असा ठपकादेखील समितीने ठेवला आहे. शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात जमीन देण्याचे शासनाचे आधीपासूनचेच धोरण आहे. त्या धोरणानुसारच एमईटीला जमीन देण्याचा निर्णय झाला होता. माझ्याकडून गेलेल्या प्रस्तावाला महसूल विभाग आणि मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळाली असेल. धोरणाची चौकट मोडली गेली नाही.- जयंत पाटील, तत्कालीन वित्तमंत्री