शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

भुजबळांची तुरुंगातील रात्र गेली शांततेत

By admin | Updated: March 19, 2016 02:26 IST

आर्थर रोडमध्ये गुरुवारी रवानगी झालेल्या छगन भुजबळांची तुरुंगातील गुरुवारची रात्र शांतपणे गेली. त्यांना रात्री फारशी झोप मात्र लागली नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि तुरुंगातील

- डिप्पी वांकाणी,  मुंबईआर्थर रोडमध्ये गुरुवारी रवानगी झालेल्या छगन भुजबळांची तुरुंगातील गुरुवारची रात्र शांतपणे गेली. त्यांना रात्री फारशी झोप मात्र लागली नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि तुरुंगातील कैद्यांना जे काही दिले जाणारे जेवणच ते जेवले, आम्ही त्यांना समीर भुजबळपासून दूर असलेल्या जागी ठेवले आहे, असे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘लोकमत’ला सांगितले की सध्या तरी आम्ही भुजबळांना घरचे जेवण आणि किंवा औषधे देण्यासाठी अर्ज करणार नाही. मात्र भुजबळांना जामीन मिळण्यासाठी कधी अर्ज करायचा यावर वकिलांची चर्चा सुरू आहे. हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज करताना आरोपी कसा दोषी नाही याचे पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे एकदा चौकशी यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल झाले की जामिनासाठी अर्ज करणे शहाणपणाचे ठरेल. परंतु ताबडतोब अर्ज करावा का यावर आम्ही विचार करीत आहोत.मात्र, भुजबळ यांना मिळालेली न्यायालयीन कोठडी ही चौकशीला वरदानच ठरली आहे, असे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यांचा पुतण्या समीर याला आणल्यावर सगळा दोष तो स्वत:वर घेईल, अशी आम्हाला भीती होती त्यामुळे या दोघांना एकमेकांसमोर आणण्यात आले नाही. ईडीच्या खूप महत्त्वाच्या साक्षीदारांनी जे पुरावे या प्रकरणात दिले आहेत त्यामुळे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ असे दोघेही त्यात दोषी ठरू शकतील, असे हा अधिकारी म्हणाला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार सध्या वकिलांच्या तुकडीसोबत बैठका सुरू आहेत. या प्रकरणात छगन भुजबळांच्या जामिनासाठी नेमका कधी अर्ज करावा यावर मोठी चर्चा सुरू आहे. भुजबळांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आम्हाला एक पाऊल मागे यावे लागले असे आम्ही समजत नाही. समीर व भुजबळ समोरासमोर आल्यावर आणखी काही पुरावे समोर येऊ शकतील. साक्षीदारांच्या निवेदनामुळे आमची बाजू बळकट झाली आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत दिले गेलेले निवेदन हे ग्राह्य धरले जाते आणि त्याचे मोल हे दिवाणी न्यायालयात केलेल्या निवेदनाएवढे असते, ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले. - समीर व भुजबळ समोरासमोर आल्यावर आणखी काही पुरावे समोर येऊ शकतील. साक्षीदारांच्या निवेदनामुळे आमची बाजू बळकट झाली आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत दिले गेलेले निवेदन हे ग्राह्य धरले जाते आणि त्याचे मोल हे दिवाणी न्यायालयात केलेल्या निवेदनाएवढे असते, ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले.