शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

भोपाळ चकमक बनावटच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 05:44 IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेली चकमक बनावट असल्याचा दावा ‘भारत बचाव’ आंदोलनचे जावेद आनंद यांनी केला

मुंबई : भोपाळमध्ये सिमीच्या आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेली चकमक बनावट असल्याचा दावा ‘भारत बचाव’ आंदोलनचे जावेद आनंद यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणीही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली आहे.भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि भोपाळमधील चकमक या प्रकरणांचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत करण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस स्पष्ट दिसतो. मध्य प्रदेशात ‘व्यापम’ घोटाळ््यातील ५०हून अधिक संशयितांचा बळी गेल्यामुळे, किमान या बनावट चकमकीबाबत तरी न्याय्य चौकशीची गरज असल्याचे मत आनंद यांनी व्यक्त केले.या वेळी ज्येष्ठ पत्रकार फिरोज मिठीबोरवाला म्हणाले की, चकमकीनंतर व्हायरल झालेले व्हिडीओ, फरार दहशतवाद्यांच्या अंगावरील कपडे आणि विविध पुराव्यांमुळे या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मृत पावलेला सुरक्षा रक्षकही बनावट चकमकीचा बळी ठरल्याचा गंभीर आरोप मिठीबोरवाला यांनी केला आहे. या प्रकरणात पोलीय यंत्रणाही सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी केवळ न्यायालयामार्फतच करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)