शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भोईरपाडा जलमय!

By admin | Updated: June 28, 2016 03:09 IST

पावसाच्या तडाख्याने वसईत ठिकठिकाणी पाणी साठल्याने वसई विरार महापालिकेचा नालेसफाईचा दावा फेल ठरला आहे.

वसई : पावसाच्या तडाख्याने वसईत ठिकठिकाणी पाणी साठल्याने वसई विरार महापालिकेचा नालेसफाईचा दावा फेल ठरला आहे. नालासोपारा शहरात आजही पाणी साचून राहिले होते. तर काल गावराईपाड्यातील भोईरपाड्यात गटारातील पाणी घुसल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई-विरार महापालिकेचा पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण केल्याचा दावा पहिल्याच पावसाने फोल केल्याने पालिका प्रशासन चांगलेच तोंडघशी पडले आहे. नालासोपारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाणी तुंबून राहिले आहे. त्यातच आता वसई पूर्वेतील गावराईपाड्यातील भोईरपाड्यात पालिकेच्या सफाई कामाचा पावसाने चांगलाच पंचनामा केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने भोईरपाडा जलमय झाला असून लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. पाण्याबरोबर गटारातील पाणी देखील लोकांच्या घरात व दुकानात घुसल्याने रोगराई पसरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वसई पूर्वेतील पालिकेच्या प्रभाग क्र.७२ मध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत करुन टाकले आहे. भोईरपाड्यातील लोकांच्या घरात एक फुटापर्यंत पाणी साचल्याने त्यांचे संसार खाटेवर घ्यावे लागले आहेत.(वार्ताहर)>तातडीने उपाय करा स्थानिकांची मागणीपावसाळी पाण्याबरोबर गटारातील घाण देखील लोकांच्या घरात घुसल्याने सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण निर्मांण झाले आहे. त्यामुळे प्रभागात रोगराई पसरण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने या प्रभागात तातडीने उपाययोजना करावी अशीही त्यांची मागणी आहे.