शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकरला दिसतोय ‘हरियाल’ तर जुन्नरमध्ये ‘नीलकंठ’

By admin | Updated: March 3, 2017 01:04 IST

महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असणाऱ्या ‘हरियाल’ या पक्ष्याचे भीमाशंकर परिसरात वास्तव्य दिसू लागले आहे.

कांताराम भवारी, अशोक खरात डिंभे- महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असणाऱ्या ‘हरियाल’ या पक्ष्याचे भीमाशंकर परिसरात वास्तव्य दिसू लागले आहे. सध्या पोखरी घाटाच्या पायथ्याशी गोहे पाझर तलावाच्या परिसरात या पक्ष्यांचे थवे मार्च-एप्रिलच्या दरम्यान पाहावयास मिळत आहेत. वडाच्या झाडांची फळे परिपक्व होऊ लागताच या परिसरात ‘हरियाल’ दिसत आहेत. हरियाल पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी परिसरातील त्यांची वसतीस्थाने विकसीत करण्याची गरज भासू लागली आहे. ‘हरियाल’ (हिरवे कबूतर) हा पक्षी राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो. ‘ट्रेशन फोनिकोप्टेरा’ असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव आहे. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर या सारख्या झाडांच्या सान्निध्यात या पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे पाहावयास मिळते. हा कबूतर वंशीय पक्षी आहे. हरियाल महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून ओळखला जातो. निळसर कबूतराच्या आकाराचा, मजबूत बांध्याचा हा पक्षी आहे. रंग पिवळा, आॅलिव्ह-हिरवा आणि राखट करडा, खांद्यावर जांभळ्या रंगाचा डाग असतो. याचे पिवळे पोट ही याला ओळखण्याची मुख्य खूण आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हे पक्षी अन्न मिळविण्यासाठी बाहेर पडतात. फळांनी लगडलेल्या फांदीवर हा पक्षी अतिशय कुशलपणे फळे तोडताना दिसतो. जरासाही धोका जाणवल्यास जागच्या जागी थिजून थांबतो. झाडात याचा रंग इतका बेमालूमपणे मिसळतो, की तो सहजासहजी दिसत नाही. सध्या भीमाशंकर व परिसरात जंगलातील वडाच्या झाडांना लालबुंद फळे लगडली आहेत. ही फळे परिपक्व झाल्याने या जंगलमेव्याचा आस्वाद लुटण्यासाठी अनेक जातीचे पक्षी या झाडांकडे आकर्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पोखरी घाटाच्या पायथ्याशी गोहे पाझर तलावाजवळ अनेक वडाची झाडे आहेत.सध्या ही झाडे फळांनी लगडली असून या लगडलेल्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी सध्या हरियालचे वास्तव्य या परिसरात असल्याचे पाहावयास मिळते. घाटातील पहिल्या वळणावरील झाडांवर या पक्ष्यांचे थवे विसावले आहेत. > खोडदनीलकंठ म्हणजेच निळ्या गळ्याचा किंवा शंकर म्हणूनही ओळखला जाणारा हा नीलकंठ नावाचा पक्षी सध्या जुन्नर तालुक्यात विहार करताना दिसतोय. विशेष म्हणजे आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत हा पक्षी भारतात वास्तव्य करतो आणि महाशिवरात्री झाल्यानंतर हा नीलकंठ भारतातून निघून जातो, असे म्हटले जाते. नीलकंठ पक्षाचा छाती आणि गळाही अगदी निळा असल्यामुळे त्याला शंकराच्या नावाने ओळखले जाते. केवळ या पक्षाचे नाव हे नीलकंठ असल्यामुळे संपूर्ण भारत देशात या पक्षाची कोणीही चुकूनही हत्या करत नाही. हा नीलकंठ नॉर्थ युरोशिया व लडाख येथून महाराष्ट्रात येतो. नीलकंठबाबत माहिती देताना खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक म्हणले, की ‘या पक्ष्याला मराठीत नीलकंठ व शंकर म्हणतात, संस्कृतमध्ये श्याम कलह म्हणतात तर इंग्रजीत ब्ल्यू थ्रोट म्हणतात. नीलकंठ मध्यम आकाराचा व चिमणीएवढा असतो तर मादी फिकट काळ्या रंगाची असते. तो उत्तरेकडून भारतीय उपखंडात हिवाळ्यात येतो.सध्या जुन्नर तालुक्यात हा पक्षी नद्या, नाले, पाण्याजवळची झुडपे, गवताळ प्रदेश या ठिकाणी हा नीलकंठ दिसत आहे. भारतभर मिळालेल्या पाहुणचारामुळे तो आनंदी असतो. मार्च ते जुलैमध्ये त्यांचा विणीचा हंगाम असतो. हिवाळ्यात शांत आणि लाजाळू असणारा हा नीलकंठ विणीच्या हंगामात अत्यंत आक्रमक व सुंदर गाणारा बनतो.’