शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदी कोरडी

By admin | Updated: October 31, 2016 01:23 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे.

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. नदीला पाणीच नसल्यामुळे कांदा लागवड बंद आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून भीमा नदीला चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.उन्हाचा तडाखा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे पिके जळून गेली आहेत. तसेच पाण्याअभावी कांदा लागवडी खोळंबल्या आहेत. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतील पाण्यांनी तळ गाठला आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात खरपुडी येथील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. दोन दिवसांपूर्वी या बंधाऱ्याला ढापे लावले आहेत. मात्र नदीला वाहते पाणीच नसल्यामुळे बंधाऱ्यात यंदा अजून पाणी साठले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तातडीने भीमा नदीत चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी मांजरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, मनोहर मांजरे, यांच्यासह खरपुडी, मलघेवाडी, शिरोली, मांजरेवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)>वीजपंप पडले मोकळेमांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी, शिरोली, खरपुडी या परिसरातून भीमा नदी वाहते. गेल्या दहा वर्षांत प्रथमच आॅक्टोबर महिन्यात कोरडी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. वीजपंप मोकळे पडले आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी ही पिके घेतली आहेत.