शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

भीमा नदी कोरडी

By admin | Updated: October 31, 2016 01:23 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे.

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. नदीला पाणीच नसल्यामुळे कांदा लागवड बंद आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून भीमा नदीला चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.उन्हाचा तडाखा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे पिके जळून गेली आहेत. तसेच पाण्याअभावी कांदा लागवडी खोळंबल्या आहेत. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतील पाण्यांनी तळ गाठला आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात खरपुडी येथील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. दोन दिवसांपूर्वी या बंधाऱ्याला ढापे लावले आहेत. मात्र नदीला वाहते पाणीच नसल्यामुळे बंधाऱ्यात यंदा अजून पाणी साठले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तातडीने भीमा नदीत चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी मांजरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, मनोहर मांजरे, यांच्यासह खरपुडी, मलघेवाडी, शिरोली, मांजरेवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)>वीजपंप पडले मोकळेमांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी, शिरोली, खरपुडी या परिसरातून भीमा नदी वाहते. गेल्या दहा वर्षांत प्रथमच आॅक्टोबर महिन्यात कोरडी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. वीजपंप मोकळे पडले आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी ही पिके घेतली आहेत.