शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बाबासाहेबांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन

By admin | Updated: December 1, 2014 02:32 IST

राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली.

मुंबई : राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. स्मारकाप्रकरणी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल भाजपा सरकारचे आभार मानण्यासाठी आज सायंकाळी दादरच्या इंदू मिलजवळ सामिजक समता मंचच्या वतीने राजव्यापी मेळाव्याचे आयोजन सामाजिक समता मंचचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांनी केले होते. या वेळी तावडे म्हणाले की, स्मारकासाठी केंद्र सरकारला साधे ‘अंडरटेंकिंग’चे पत्रही पूर्वीच्या सरकारने दिले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते केंद्राला दिल्याने पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. स्मारकासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. आघाडी सरकारने या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले. कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशीष शेलार, आ. भाई गिरकर यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यासाठी कांबळे यांनी अरबी समुद्रात १०० एकर भरणी करावी, या मागणीसाठी सर्वप्रथम १९९८ ला अरबी समुद्रात मूठभर माती टाकण्याचे आंदोलन छेडले होते. स्मारकाच्या उभारणीसाठी राज्यातील ४०० खेड्यांमधून जनजागृती, आंदोलने व मोर्चे काढले होते, अशी माहिती कांबळे यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)> नव्या सरकारने ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक लवकर उभारण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करावी ही सामिजक समता मंचचच्या मागणीचे स्मरण सरकारला देण्यासाठी दादर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, असे ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांनी सांगितले.