शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

‘भारतमाते’चा पोरखेळ सुरू आहे का?

By admin | Updated: April 11, 2016 01:47 IST

‘भारतमाता की जय म्हणा, भारतमाता की जय म्हणा,’ असे सांगितले जात आहे. अरे, हा काय भारतमातेचा पोरखेळ सुरू आहे का? तुम्ही भारतमातेचा पोरखेळ केला आहे.

मुंबई : ‘भारतमाता की जय म्हणा, भारतमाता की जय म्हणा,’ असे सांगितले जात आहे. अरे, हा काय भारतमातेचा पोरखेळ सुरू आहे का? तुम्ही भारतमातेचा पोरखेळ केला आहे. आता तुम्हाला भारतमाता दिसते का? भारतमातेवर आक्रमणे झाली तेव्हा तुम्ही कुठे होता? शुद्र आणि स्त्रियांनी हा देश टिकवला आहे; आणि आता तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवता?, असा हल्लाबोल ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी प्रस्थापितांवर केला.राजकीय व्यक्तींना फसवेगिरी करता येत नाही. फसवेगिरी केली की ‘अच्छे दिन’च्या गोष्टी कराव्या लागतात, अशी खिल्लीही त्यांनी मोदी सरकारचा उल्लेख न करता उडविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीतर्फे माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात ‘आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ या विषयावर रविवारी चर्चासत्र झाले.राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. सुरेश माने यांनी बाबासाहेबांना आपण जाणून घेतले नसल्याची खंत व्यक्त केली. आपल्याकडे आंबेडकर मॉडेल स्वीकारणारे लोक खूप आहेत. परंतु ते अंमलात आणणारे लोक कमी आहेत. एकट्या ‘बुद्धीझम’ने आदर्श समाज निर्माण होईल का?, यावर चिंतन आणि मनन होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी २०१६ मध्येही जात टिकून असल्याबाबत खंत व्यक्त केली.एम. एस. बहेल यांनी शिक्षण घेऊन माणूस मोठा होणार नाही, असे सांगत विचार बदलण्याचे आणि कृती करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी तरुणांना वैचारिक वाद घालण्याऐवजी कृतीशील होण्याचे आवाहन केले. आयकर प्राधिकरणाचे आयुक्त सुबचन राम यांनी आदर्शवाद आणि विचार यात फरक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आधी बहुजन समाजाची व्याख्या निश्चित करा, तरच आपण शासन करू. अन्यथा आपण भावनाप्रधान असल्याने आपला ‘जय भीम, जय भीम’ बोलून वापर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. लंडनमधील उद्योजक एम.एस. बहेल, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)