शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘भारतमाते’चा पोरखेळ सुरू आहे का?

By admin | Updated: April 11, 2016 01:47 IST

‘भारतमाता की जय म्हणा, भारतमाता की जय म्हणा,’ असे सांगितले जात आहे. अरे, हा काय भारतमातेचा पोरखेळ सुरू आहे का? तुम्ही भारतमातेचा पोरखेळ केला आहे.

मुंबई : ‘भारतमाता की जय म्हणा, भारतमाता की जय म्हणा,’ असे सांगितले जात आहे. अरे, हा काय भारतमातेचा पोरखेळ सुरू आहे का? तुम्ही भारतमातेचा पोरखेळ केला आहे. आता तुम्हाला भारतमाता दिसते का? भारतमातेवर आक्रमणे झाली तेव्हा तुम्ही कुठे होता? शुद्र आणि स्त्रियांनी हा देश टिकवला आहे; आणि आता तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवता?, असा हल्लाबोल ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी प्रस्थापितांवर केला.राजकीय व्यक्तींना फसवेगिरी करता येत नाही. फसवेगिरी केली की ‘अच्छे दिन’च्या गोष्टी कराव्या लागतात, अशी खिल्लीही त्यांनी मोदी सरकारचा उल्लेख न करता उडविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीतर्फे माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात ‘आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ या विषयावर रविवारी चर्चासत्र झाले.राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. सुरेश माने यांनी बाबासाहेबांना आपण जाणून घेतले नसल्याची खंत व्यक्त केली. आपल्याकडे आंबेडकर मॉडेल स्वीकारणारे लोक खूप आहेत. परंतु ते अंमलात आणणारे लोक कमी आहेत. एकट्या ‘बुद्धीझम’ने आदर्श समाज निर्माण होईल का?, यावर चिंतन आणि मनन होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी २०१६ मध्येही जात टिकून असल्याबाबत खंत व्यक्त केली.एम. एस. बहेल यांनी शिक्षण घेऊन माणूस मोठा होणार नाही, असे सांगत विचार बदलण्याचे आणि कृती करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी तरुणांना वैचारिक वाद घालण्याऐवजी कृतीशील होण्याचे आवाहन केले. आयकर प्राधिकरणाचे आयुक्त सुबचन राम यांनी आदर्शवाद आणि विचार यात फरक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आधी बहुजन समाजाची व्याख्या निश्चित करा, तरच आपण शासन करू. अन्यथा आपण भावनाप्रधान असल्याने आपला ‘जय भीम, जय भीम’ बोलून वापर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. लंडनमधील उद्योजक एम.एस. बहेल, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)