शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

‘भारतमाता’वरून विधान परिषदेतही गदारोळ

By admin | Updated: April 5, 2016 02:28 IST

‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांनाच या देशात राहण्याचा अधिकार असल्याची भूमिका मांडण्याचा हक्क मुख्यमंत्र्यांना कोणी दिला़?, देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे तुम्ही कोण?

मुंबई : ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांनाच या देशात राहण्याचा अधिकार असल्याची भूमिका मांडण्याचा हक्क मुख्यमंत्र्यांना कोणी दिला़?, देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे तुम्ही कोण? असा सवाल करत, विरोधकांनी विधान परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला. सत्ताधारी बाकांवरूनही तितकेच चोख प्रत्युत्तर आल्याने, सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘भारत माता की जय’च्या वादाबाबत काँग्रेसचे संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, सभापती रामराजे निंबाळकर यांनी हा प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी गदारोळाला सुरुवात केली. त्यामुळे अखेर सभापतींनी दोन मिनिटे सदस्यांना बोलण्याची परवानगी दिली. राज्यात भेडसावणारे प्रश्न सोडवण्यात विफलता आल्यामुळे, अशी विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दत्त यांनी केला, तर एका वाक्याने नागरिकत्व ठरणार असेल, तर सर्वात आधी एमआयएमच्या ओवेसीवर सरकारने कारवाई करायला हवी होती, असे मुंडे म्हणाले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याने कामकाज तहकूब करण्यात आले.सभागृहात बहुमत असल्याचा राजकीय फायदा उठवून कुठल्याही विषयावरून गोंधळ घालून, राज्यात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करू नका, असे गिरीश बापट म्हणाले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री हे सभागृहातील गोंधळ मिटवण्यापेक्षा गोंधळ वाढवत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.