शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतमाता’वरून विधान परिषदेतही गदारोळ

By admin | Updated: April 5, 2016 02:28 IST

‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांनाच या देशात राहण्याचा अधिकार असल्याची भूमिका मांडण्याचा हक्क मुख्यमंत्र्यांना कोणी दिला़?, देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे तुम्ही कोण?

मुंबई : ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांनाच या देशात राहण्याचा अधिकार असल्याची भूमिका मांडण्याचा हक्क मुख्यमंत्र्यांना कोणी दिला़?, देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे तुम्ही कोण? असा सवाल करत, विरोधकांनी विधान परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला. सत्ताधारी बाकांवरूनही तितकेच चोख प्रत्युत्तर आल्याने, सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘भारत माता की जय’च्या वादाबाबत काँग्रेसचे संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, सभापती रामराजे निंबाळकर यांनी हा प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी गदारोळाला सुरुवात केली. त्यामुळे अखेर सभापतींनी दोन मिनिटे सदस्यांना बोलण्याची परवानगी दिली. राज्यात भेडसावणारे प्रश्न सोडवण्यात विफलता आल्यामुळे, अशी विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दत्त यांनी केला, तर एका वाक्याने नागरिकत्व ठरणार असेल, तर सर्वात आधी एमआयएमच्या ओवेसीवर सरकारने कारवाई करायला हवी होती, असे मुंडे म्हणाले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याने कामकाज तहकूब करण्यात आले.सभागृहात बहुमत असल्याचा राजकीय फायदा उठवून कुठल्याही विषयावरून गोंधळ घालून, राज्यात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करू नका, असे गिरीश बापट म्हणाले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री हे सभागृहातील गोंधळ मिटवण्यापेक्षा गोंधळ वाढवत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.