शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतमाता की जय’वरून नव्या राजकीय वादाला तोंड

By admin | Updated: March 17, 2016 04:58 IST

‘भारतमाता की जय’वरून देशात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असताना आज विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे मुंबईतील

विधानसभेत रणकंदन : एमआयएमचे आमदार निलंबितमुंबई : ‘भारतमाता की जय’वरून देशात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असताना आज विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे मुंबईतील आमदार वारिस पठाण यांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. राज्यपालांच्या अभिभाषणावर इम्तियाज जलील बोलत असताना त्यांनी स्मारकांच्या उभारणीला विरोध दर्शविला. स्मारकांची गरज काय? हा लोकांच्या घामाचा तसेच कररूपाने मिळणारा पैसा आहे. राज्यात भीषण दुष्काळ असताना स्मारकांवर खर्च कशाला, असा सवाल जलील यांनी केला. जलील यांच्या वक्तव्याने सत्तारूढ बाकावर अस्वस्थता पसरली. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध कशासाठी, असा सवाल करीत गदारोळाला सुरुवात झाली. त्यातच भाजपाचे राम कदम यांनी ‘भारतमाता की जय बोलो’ असे आवाहन जलील यांना केले. ‘भारतमाता की जय’ म्हणणार का, अशी विचारणा सत्तापक्षाकडून होत असताना वारिस पठाण बसल्या जागी म्हणाले की, भारतमाता की जय म्हटलेच पाहिजे, असे काही घटनेत लिहिलेले नाही. विजय मल्ल्याने देश सोडून पळून जाताना केलेल्या टिष्ट्वटमध्ये भारतमाता की जय म्हटले होते. तसे म्हणणे तुम्हाला अभिप्रेत आहे का? देशावर आमचेही प्रेम आहे. आम्ही जयहिंद म्हणू!पठाण यांच्या या उत्तराने सभागृहात एकच रणकंदन माजले. भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणे हा देशाचा आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांचा घोर अपमान असून हा देशद्रोह असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जलील व पठाण यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. सर्व सदस्य वेलमध्ये उतरले. कामकाज तब्बल पाच वेळा तहकूब करण्यात आले. या गदारोळातच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही निलंबनाचा आग्रह धरला. शिवसेनेचे गुलाबराव पाटील, भाजपाचे आशिष शेलार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना या सभागृहात बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ठणकावून सांगितले. सभागृहाचे कामकाज तिसऱ्यांदा तहकूब झाले तेव्हा देशप्रेमाच्या प्रचंड घोषणांचा जोर अधिकच वाढला. एमआयएम आमदारांना भाजपा-शिवसेनेच्या किमान ५० आमदारांनी घेरून त्वेषाने, ‘इस देश मे रहना होगा, भारतमाता की जय कहना होगा, इस देश मे रहना होगा, वंदे मातरम कहना होगा, ओवेसी हाय हाय’ अशा घोषणांचा धोशा लावला. सभागृहात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले. जलील आणि पठाण जागीच शांतपणे बसून होते. काहीही होऊ शकेल, अशी तणावाची स्थिती होती पण दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ सदस्यांनी सगळ्यांना समजावले. शेवटी संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी वारिस पठाण यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)वारिस पठाण यांना संरक्षणएमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या मुंबईतील घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पठाण यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते.‘कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही’, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी लातूर जिल्ह्यात उदगिर येथे झालेल्या सभेत म्हटले होते.एमआयएमआमदारांची भूमिका चूकएमआयएमच्या आमदारांची भूमिका चुकीचीच आहे. भारतमातेचा अपमान कोणीही करता कामा नये, पण या दोघांच्या चुकीच्या भूमिकेमुळे अल्पसंख्याक समुदायाला कोणी लक्ष्य करता कामा नये. - अब्दुल सत्तार, काँग्रेसतसे म्हणणे हा माझा अधिकारते म्हणतात की, मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, कारण राज्यघटनेचे तसे बंधन नाही. शेरवानी आणि टोपी घाल, असेही राज्यघटनेने सांगितलेले नाही. (तरीही ते घालतात). ‘भारतमाता की जय’ म्हणणे हे माझे कर्तव्य आहे की नाही, याच्याशी माझा संबंध नाही. तसे म्हणण्याचा मला हक्क आहे, म्हणून मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार.- जावेद अख्तर, ज्येष्ठ गीतकार राष्ट्रवादाची हीच एकमेव व्याख्या हवी भारतवासीयांसाठी ‘भारतमाता की जय’ हीच राष्ट्रवादाची एकमेव व्याख्या असायला हवी. इतर सर्व गोष्टी पळवाटा आहेत.- अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते (टिष्ट्वटरवर)पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुका पाहूनच भाजपा आणि एमआयएमने एकत्र येऊन ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. - अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेसचे प्रवक्ते