शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भातरोपांना जीवदान

By admin | Updated: June 27, 2016 01:36 IST

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाची कृपा होऊन पावसाला सुरुवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे.

पवनानगर : पावसाला शनिवारी रात्री सुरुवात झाली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाची कृपा होऊन पावसाला सुरुवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे. पावसाला जोर नसला, तरी शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले. पवना धरण परिसरात २० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आजअखेर ६९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात १२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस सुरू झाल्याने भातरोपाला जीवदान मिळाले असून, नाचणी पिकाच्या रोपाची डोंगरमाथ्यावरील पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.पावसामुळे काल्यार्त पर्यटकांची हजेरीकार्ला : परिसरात शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने पुणे, मुंबईतील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे या परिसरात वेगवेगळे व्यवसाय करणारे व्यावसायिक समाधानी दिसत आहेत. कार्ला, भाजे परिसरात दर वर्षी पाऊस सुरू झाल्यास पुणे-मुंबईतील पर्यटकांसह संपूर्ण राज्य-परराज्यांतूनही पर्यटक भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या वर्षी पाऊस १५ दिवस उशिराने आला. त्यामुळे पावसाबरोबर पर्यटकांनी पाठ फिरविली होती. परंतु तुरळक का होईना कार्ला, भाजे परिसरात पाऊस पडत असल्याने पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे. चांगला पाऊस झाला की, या भागातील धबधबे वाहण्यास सुरू होतील. तसतशी पर्यटकांची संख्या वाढत जाईल. पावसाची आवश्यकता आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे विक्री वाढल्याने चिक्की व्यावसायिक, रिक्षावाले, हॉटेल व्यावसायिक व इतर किरकोळ व्यावसायिक समाधानी दिसत होते. (वार्ताहर)उर्से : दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत बसलेल्या शेतकरी वर्गासाठी दोन दिवसांपासून पडणारा पाऊस शेतातील पेरणीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. सध्या भुईमूग, वाटाणा, घेवडा, वाल, मूग, चवळी पेरणीसाठी शेतकरी तयारीला लागला आहे.