शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

भातरोपांना जीवदान

By admin | Updated: June 27, 2016 01:36 IST

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाची कृपा होऊन पावसाला सुरुवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे.

पवनानगर : पावसाला शनिवारी रात्री सुरुवात झाली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाची कृपा होऊन पावसाला सुरुवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे. पावसाला जोर नसला, तरी शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले. पवना धरण परिसरात २० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आजअखेर ६९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात १२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस सुरू झाल्याने भातरोपाला जीवदान मिळाले असून, नाचणी पिकाच्या रोपाची डोंगरमाथ्यावरील पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.पावसामुळे काल्यार्त पर्यटकांची हजेरीकार्ला : परिसरात शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने पुणे, मुंबईतील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे या परिसरात वेगवेगळे व्यवसाय करणारे व्यावसायिक समाधानी दिसत आहेत. कार्ला, भाजे परिसरात दर वर्षी पाऊस सुरू झाल्यास पुणे-मुंबईतील पर्यटकांसह संपूर्ण राज्य-परराज्यांतूनही पर्यटक भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या वर्षी पाऊस १५ दिवस उशिराने आला. त्यामुळे पावसाबरोबर पर्यटकांनी पाठ फिरविली होती. परंतु तुरळक का होईना कार्ला, भाजे परिसरात पाऊस पडत असल्याने पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे. चांगला पाऊस झाला की, या भागातील धबधबे वाहण्यास सुरू होतील. तसतशी पर्यटकांची संख्या वाढत जाईल. पावसाची आवश्यकता आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे विक्री वाढल्याने चिक्की व्यावसायिक, रिक्षावाले, हॉटेल व्यावसायिक व इतर किरकोळ व्यावसायिक समाधानी दिसत होते. (वार्ताहर)उर्से : दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत बसलेल्या शेतकरी वर्गासाठी दोन दिवसांपासून पडणारा पाऊस शेतातील पेरणीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. सध्या भुईमूग, वाटाणा, घेवडा, वाल, मूग, चवळी पेरणीसाठी शेतकरी तयारीला लागला आहे.