शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भालचंद्र नेमाडेंचा सरकारकडून गौरव

By admin | Updated: May 8, 2015 04:26 IST

मराठीतील चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांच्या कोसला, हिंदू, विशाखा, ययाती अशा विविध अद्वितीय कलाकृतींतील संवाद, उतारे, कविता यांच्या उत्कट सादरीकरणाने रसिकांना

मुंबई : मराठीतील चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांच्या कोसला, हिंदू, विशाखा, ययाती अशा विविध अद्वितीय कलाकृतींतील संवाद, उतारे, कविता यांच्या उत्कट सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गेट वे आॅफ इंडिया येथे आयोजित ‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा’ या सोहळ्याचे.सोहळ्यात वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांचे स्मरण करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज उपस्थित होते. कवी किशोर कदम, तुषार दळवी, स्वानंद किरिकरे, रिमा लागू, वंदना गुप्ते यांनी मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांच्या विविध कलाकृतीतील संवाद, उतारे, कविता, पदे यांचे अभिवाचन केले. कोसला या कादंबरीतील मनूचा मृत्यू या उताऱ्याच्या कदम यांनी केलेल्या अभिवाचनाने उपस्थितांचे डोळे पाणावले. श्रीधर फडके, आशा खाडिलकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नंदेश उमप, मुग्धा वैशंपायन यांनी माझ्या मातीचे गायन, गर्जा जयजयकार आदी गाणी सादर केली़ सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते रमेश देव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, लेखक जयंत पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)