शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

भार्इंदर पालिकेत सौरऊर्जा प्रकल्प?

By admin | Updated: March 1, 2017 03:05 IST

पथदिव्यांसाठी लागणाऱ्या विजेचीही बचत करण्यासाठी पालिकेने सौर ऊर्जेचा वापर करावा अशी मागणी केली आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वास्तूतील भरमसाठ वीजवापर कमी होत नसल्याने आणि पथदिव्यांसाठी लागणाऱ्या विजेचीही बचत करण्यासाठी पालिकेने सौर ऊर्जेचा वापर करावा अशी मागणी केली आहे. तसे झाल्यास पालिका मुख्यालयाला लागणारी वीज तेथेच तयार होऊन वापरली जाईल आणि पथदिव्यांचा वीजखर्चही वाचला, तर तेवढीच बचत होईल, असा हा पर्याय आहे.या दोन्ही वीज वापरांसाठीचे बिल दरमहा लाखोंच्या घरात जाते. ते वाचविण्यासाठी पालिकेने स्वत:च्या वास्तुंमध्ये सौरऊर्जा प्रकल्प सुरु करावा, अशी मागणी उपमहापौर प्रवीण पाटील यांनी केली. पालिकेचे उत्पन्न मर्यादित असल्याने दरवर्षी जमा-खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी कसरत करावी लागते. आस्थापनेवरील खर्चापोटी केल्या जाणाऱ्या तरतुदीमुळे विकासकामांना कात्री लावावी लागते. तुटीचा आकडा वाढत जातो. उत्पन्नवाढीसाठी करवाढीच्या किंवा नवीन कर लागू करण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जातात. त्याला सहजासहजी राजकीय संमती मिळत नाही. त्यामुळे मर्यादित उत्पन्नावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळेच उत्पन्नवाढीच्या नव्या योजनांसोबतच खर्चात कपात करण्यावर भर देणे गरजेचे आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला. पालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या इमारतींत अनेक ठिकाणी गच्चीचा वापर होत नाही. त्या जागी सौरऊर्जेचा प्रकल्प सुरु केल्यास वीज खर्चात कायमची बचत होईल. सौरऊर्जा प्रकल्पाला सरकारी अनुदानही मिळत असल्याने तो फायदेशीर ठरणारा आहे. असे प्रकल्प पालिकेच्या प्रत्येक वास्तुंतील मोकळ्या जागा इमारतींची गच्ची, उद्याने, क्रीडा संकुल, स्मशानभूमी आदी ठिकाणी सुरु करणे सहज शक्य असल्याचे उपमहापौरांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांची माहिती घेऊन पालिकेनेही हे पाऊल उचलावे, असे त्यांनी सुचविले आहे. याची सुरुवात मुख्यालयापासून करावी. पालिकेकडून मीरा-भार्इंदरमध्ये बांधकाम परवानगी देताना विकासकाला सौरऊर्जेवरील हिटर लावण्याचे बंधन घातले जाते. परंतु, स्वत:च्या वीजवापरासाठी पालिका कोणताच पर्याय शोधत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. उत्पन्नवाढीसाठी अधिकाऱ्यांनी पर्याय, उपाय शोधावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)>पथदिव्यांवर होणारा वीजपुरवठ्याचा खर्च, पालिकेच्या वेगवेगळ््या कार्यालयांत आणि इतर नागरी सुविधांच्या जागेत विजेचा बेसुमार वापर होतो. त्यापोटी पालिकेला लाखो रुपयांचे वीजबिल दरमहा भरावे लागते. यात सरकारी सवलत मिळत असली, तरी अधिक वीजवापरामुळे ती तोकडी पडते. यासाठी विजेची बचत केल्यास त्याचा फायदा पालिकेला कायमस्वरूपी मिळेल, असा पाटील यांचा मुद्दा आहे.