शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नामदेवांमुळेच उत्तरेत भागवत धर्माची पताका

By admin | Updated: November 1, 2015 01:43 IST

खैबरखिंडीतून येणाऱ्या हल्लेखोरांच्या अत्याचारांचा फटका वायव्य भारताला सर्वाधिक होता. त्यामुळे या भूमीत जाऊन आपली भाषा-रीतिरिवाज, संस्कृती जपण्यासाठी बळ देण्याची निकड

- दीपक होमकर,  पंढरपूरखैबरखिंडीतून येणाऱ्या हल्लेखोरांच्या अत्याचारांचा फटका वायव्य भारताला सर्वाधिक होता. त्यामुळे या भूमीत जाऊन आपली भाषा-रीतिरिवाज, संस्कृती जपण्यासाठी बळ देण्याची निकड ओळखून नामदेवांनी तेथे भागवत धर्माचा प्रचार केला. उत्तर भारतात नामदेवांमुळेच भागवत धर्म व संस्कृती टिकली, असे प्रतिपादन संत नामदेव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कामत यांनी केले़पंढरपुरात शनिवारी पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले़ अध्यक्षीय भाषणात कामत म्हणाले की, ‘नामा म्हणे आम्ही पायरीचे चीरे.. संत पाय हिरे वरी देती’ हाच नामदेवांचा सिद्धांत आहे. ते ज्ञानेदवांचे चरित्र लिहिणारे मराठीतील आद्य चरित्रकार, आद्य आत्मचरित्रकार, आद्य प्रवासवर्णनकार होते,तसेच त्यांनी त्या काळात जनाबार्इंच्या गळ्यात वीणा देऊन स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली. नामदेवांनी ज्ञानेश्वरांसोबत जेव्हा उत्तर भारत तीर्थयात्रा केली, त्याचवेळी तेथील पारतंत्र्याची, धार्मिक गळचेपीची आणि सामाजिक दुर्बलतेची स्थिती जवळून अनुभवली. मंगळवेढ्याचे संत चोखामेळा यांच्या अस्थी आणून उपेक्षितांचा खऱ्या अर्थाने गौरव केला. पंजाब प्रांतात जाऊन त्यांनी भागवत धर्माचा, आपल्या संस्कृतीचा वारसा टिकविण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर नानकदेव यांनी त्यांच्यासह या कार्यास प्रारंभ केला. त्यामुळे संत नामदेव हे ज्याप्रमाणे वाङ्मयाचे आद्यपुरुष आहेत, तसेच ते वैष्णवांचे आणि शैवांचेही कुळपुरुष असल्याचे गौरवोद्गार डॉ़ कामत यांनी काढले़.  ‘८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे झाले. ते खऱ्या अर्थाने अखिल भारतीय संमेलन म्हटले पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले़ आ. भारत भालके, माजी आ. सुधाकर परिचारक आदी प्रमुख पाहुणे होते. उद्घाटनाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. यु. म. पठाण प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)