शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तूर खरेदीत सरकारने केला शेतकऱ्यांशी विश्वासघात - विखे-पाटील

By admin | Updated: April 24, 2017 19:12 IST

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले असतानाही शासकीय खरेदी केंद्रांनी तूर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24  -  शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले असतानाही शासकीय खरेदी केंद्रांनी तूर खरेदीस नकार देणे,हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तूर खरेदीसंदर्भात वाढत्या तक्रारी, सरकारचा हलगर्जीपणा आणि अनेक ठिकाणी शेतकरी संतप्त होण्याच्या घटनांसंदर्भात प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
 ते म्हणाले की, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री सांगतात की सरकारची खरेदीची क्षमता संपली असून, अधिक तूर खरेदी करावयाची असल्यास केंद्रीय अर्थ मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल. याचाच अर्थ यंदा नेमकी किती तूर झाली व किती तूर शासकीय खरेदी केंद्रांवर येईल, याचा साधा अभ्यास सुद्धा हे सरकार वेळेत करू शकलेले नाही. शेतकऱ्यांचा विषय समोर आला की, परवानगी आणि अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जातो आणि त्याचा फटका बळीराजाला सहन करावा लागतो.
 
अजूनही असंख्य खरेदी केंद्रांवर हजारो क्विंटल तूर तोलाईसाठी प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. अशा परिस्थितीत खरेदीची व्यवस्था वाढविण्याऐवजी खरेदी बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांना लुटण्यासाठी व्यापाऱ्यांना मोकळे रान देण्यासारखेच आहे. सरकारने तूर खरेदीसाठी ठरवलेली 22 एप्रिलची मूदत रद्दबातल ठरवून संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवावी आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे तातडीने मिळतील, याबाबत पावले उचलावीत, अशीही मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
 
व्यापारी जेमतेम तीन-साडेतीन हजार रूपये क्विंटल दराने खरेदी करीत आहेत. सरकारच्या अक्षम्य उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांने माल विकणे भाग पडत असून, त्याचाच उद्रेक म्हणून काल यवतमाळला बाजार समितीत प्रचंड तोडफोड झाली. आजही यवतमाळसह विदर्भ-मराठवाड्यात अनेक ठिकाणी तणावाची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकारने वेळीच ठोस पावले न उचलल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा आम्ही यापूर्वीच दिला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार गांभीर्याने पहायला तयार नसल्याने आता बळीराजाचा संयम सुटू लागल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.