शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तूर खरेदीत सरकारने केला शेतकऱ्यांशी विश्वासघात - विखे-पाटील

By admin | Updated: April 24, 2017 19:12 IST

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले असतानाही शासकीय खरेदी केंद्रांनी तूर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24  -  शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले असतानाही शासकीय खरेदी केंद्रांनी तूर खरेदीस नकार देणे,हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तूर खरेदीसंदर्भात वाढत्या तक्रारी, सरकारचा हलगर्जीपणा आणि अनेक ठिकाणी शेतकरी संतप्त होण्याच्या घटनांसंदर्भात प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
 ते म्हणाले की, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री सांगतात की सरकारची खरेदीची क्षमता संपली असून, अधिक तूर खरेदी करावयाची असल्यास केंद्रीय अर्थ मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल. याचाच अर्थ यंदा नेमकी किती तूर झाली व किती तूर शासकीय खरेदी केंद्रांवर येईल, याचा साधा अभ्यास सुद्धा हे सरकार वेळेत करू शकलेले नाही. शेतकऱ्यांचा विषय समोर आला की, परवानगी आणि अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जातो आणि त्याचा फटका बळीराजाला सहन करावा लागतो.
 
अजूनही असंख्य खरेदी केंद्रांवर हजारो क्विंटल तूर तोलाईसाठी प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. अशा परिस्थितीत खरेदीची व्यवस्था वाढविण्याऐवजी खरेदी बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांना लुटण्यासाठी व्यापाऱ्यांना मोकळे रान देण्यासारखेच आहे. सरकारने तूर खरेदीसाठी ठरवलेली 22 एप्रिलची मूदत रद्दबातल ठरवून संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवावी आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे तातडीने मिळतील, याबाबत पावले उचलावीत, अशीही मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
 
व्यापारी जेमतेम तीन-साडेतीन हजार रूपये क्विंटल दराने खरेदी करीत आहेत. सरकारच्या अक्षम्य उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांने माल विकणे भाग पडत असून, त्याचाच उद्रेक म्हणून काल यवतमाळला बाजार समितीत प्रचंड तोडफोड झाली. आजही यवतमाळसह विदर्भ-मराठवाड्यात अनेक ठिकाणी तणावाची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकारने वेळीच ठोस पावले न उचलल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा आम्ही यापूर्वीच दिला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार गांभीर्याने पहायला तयार नसल्याने आता बळीराजाचा संयम सुटू लागल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.