शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

तूर खरेदीत सरकारने केला शेतकऱ्यांशी विश्वासघात - विखे-पाटील

By admin | Updated: April 24, 2017 19:12 IST

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले असतानाही शासकीय खरेदी केंद्रांनी तूर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24  -  शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले असतानाही शासकीय खरेदी केंद्रांनी तूर खरेदीस नकार देणे,हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तूर खरेदीसंदर्भात वाढत्या तक्रारी, सरकारचा हलगर्जीपणा आणि अनेक ठिकाणी शेतकरी संतप्त होण्याच्या घटनांसंदर्भात प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
 ते म्हणाले की, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री सांगतात की सरकारची खरेदीची क्षमता संपली असून, अधिक तूर खरेदी करावयाची असल्यास केंद्रीय अर्थ मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल. याचाच अर्थ यंदा नेमकी किती तूर झाली व किती तूर शासकीय खरेदी केंद्रांवर येईल, याचा साधा अभ्यास सुद्धा हे सरकार वेळेत करू शकलेले नाही. शेतकऱ्यांचा विषय समोर आला की, परवानगी आणि अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जातो आणि त्याचा फटका बळीराजाला सहन करावा लागतो.
 
अजूनही असंख्य खरेदी केंद्रांवर हजारो क्विंटल तूर तोलाईसाठी प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. अशा परिस्थितीत खरेदीची व्यवस्था वाढविण्याऐवजी खरेदी बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांना लुटण्यासाठी व्यापाऱ्यांना मोकळे रान देण्यासारखेच आहे. सरकारने तूर खरेदीसाठी ठरवलेली 22 एप्रिलची मूदत रद्दबातल ठरवून संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवावी आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे तातडीने मिळतील, याबाबत पावले उचलावीत, अशीही मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
 
व्यापारी जेमतेम तीन-साडेतीन हजार रूपये क्विंटल दराने खरेदी करीत आहेत. सरकारच्या अक्षम्य उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांने माल विकणे भाग पडत असून, त्याचाच उद्रेक म्हणून काल यवतमाळला बाजार समितीत प्रचंड तोडफोड झाली. आजही यवतमाळसह विदर्भ-मराठवाड्यात अनेक ठिकाणी तणावाची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकारने वेळीच ठोस पावले न उचलल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा आम्ही यापूर्वीच दिला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार गांभीर्याने पहायला तयार नसल्याने आता बळीराजाचा संयम सुटू लागल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.