शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियान उसनवारीवर

By admin | Updated: December 11, 2015 02:45 IST

नऊ महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा ; जनजागृती प्रभावित.

संतोष वानखडे / वाशिम: स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाची हमी देण्याच्या उद्देशातून, राज्यातील १0 जिल्ह्यांत सुरू असलेल्या ह्यबेटी बचाओ- बेटी पढाओह्ण अभियानाला जवळपास दहा महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा आहे. निधीअभावी सदर अभियान ह्यउधारीह्णवर सुरू असून, याचा विपरित परिणाम जनजागृतीच्या कार्यक्रमांवर होत आहे. मुलगा हाच वंशाचा दिवा असल्याच्या मानसिकतेतून स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरात कमालिची तफावत येत आहे. यातूनच स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड चाचणी आदी प्रकार घडत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्ण अभियान २१ फेब्रुवारी २0१५ पासून देशातील १00 जिल्ह्यांत सुरू केले. सदर अभियान महिला व बाल विकास मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून, यासाठी १00 टक्के निधीची हमी केंद्र शासनाने घेतली. मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील १00 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील बुलडाणा, वाशिम, बीड, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली व जालना या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात सर्वात कमी लिंगगुणोत्तर प्रमाण बीड जिल्ह्यात ८0७ आहे. त्यानंतर जळगाव ८४२, अहमदनगर ८५२, बुलडाणा ८५५, औरंगाबाद ८५८, वाशिम व कोल्हापूर प्रत्येकी ८६३, उस्मानाबाद व सांगली प्रत्येकी ८६७, जालना ८७0 असे लिंगगुणोत्तर प्रमाण असून, ही चिंताजनक बाब आहे. राज्यातील या दहा जिल्ह्यांत लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षिततेबाबत खात्री देणे, स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे ही प्रमुख चार उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आले. या दृष्टिकोनातून या अभियानाचा कृती आराखडाही आखण्यात आला.